
अचलपूर-चांदूरबाजारचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी मंगळवारी चांदूर बाजार येथील जलसंपदा कार्यालयात विविध विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली. सिंचन, शहरातील पथदिवे, ग्रामीण भागातील पूल आणि रस्त्यांच्या अर्धवट कामांची माहिती यावेळी घेण्यात आली. आमदारांनी
.
या बैठकीला जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत उमप, उपविभागीय अभियंता अनुप खवणे, प्रज्वल वंजारी, कुलदीप गौरखेडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मुरली माकोडे, विलास तायवाडे, मनीष नांगलिया उपस्थित होते. आमदार तायडे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांनी अर्ज देऊनही अधिकाऱ्यांकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी मांडली. ही व्यथा ऐकून आमदार तायडे यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. “काम करायचे नसेल तर स्पष्ट सांगा, त्यांच्या बदलीची व्यवस्था आम्ही करू,” असे ते म्हणाले. मतदारसंघात राहायचे असेल तर आलेल्या शेतकऱ्यांचे समाधान करून त्यांची कामे करावीच लागतील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
शेतीसंबंधी काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत, ज्यात पिकांची नासाडी, अतिवृष्टीची न मिळालेली मदत, वन्यजीवांचा त्रास आणि अनियमित वीजपुरवठा यांचा समावेश आहे. हे मुद्दे वारंवार लक्षात आणून दिल्यानंतरही संबंधित विभाग शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत नसल्याने ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमुळे आता शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली असून, शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
तालुक्यात पूर्णा आणि चारघड असे दोन प्रकल्प आहेत. या हंगामात शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता असल्याने दोन्ही धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या. तसेच, शेतीला कालव्याद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याची, त्या रस्त्यावरील पुलांची आणि कालव्याच्या पाइपलाइनची अर्धवट कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कालव्याला लागून असलेल्या रस्त्याची समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असून, ती दूर करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



