digital products downloads

पुन्हा सोसाट्याचा वारा अन् पावसाचा मारा; अर्ध्या महाराष्ट्रात ‘यलो अलर्ट’

पुन्हा सोसाट्याचा वारा अन् पावसाचा मारा; अर्ध्या महाराष्ट्रात ‘यलो अलर्ट’

Maharashtra Weather News : मुंबई शहर आणि उपनरांसह कोकणातील काही भागांमध्ये पावसानं विश्रांती घेतलेली असतानाच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांसह विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र जोरदार पावसाची हजेरी, तर काही भागांमध्ये पूरस्थिती पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या मुंबई केंद्रानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल असा इशारा वर्तवण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी असल्या कारणानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही दुर्गम भागांमध्येसुद्धा वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी राहणार असून, यादरम्यानवी ताशी 40 किमी वेगानं वारे वाहतील, याची दक्षता बाळगावी असा इशारा दारी करण्यात आला आहे. 

ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी केंद्रीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजाचा आढावा घेत दिलेल्या माहितीनुसार, ’13 ते 15 सप्टेंबरपर्यंत अंतर्गत महाराष्ट्र, उत्तर कोकणातील काही भागात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.’ वरील अंदाजामध्ये मुंबईसह नजीकच्या भागांचा आणि प्रामुख्यानं किनारपट्टी क्षेत्रांचा समावेश असून पुढच्या 24 तासांपासूनच काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची हजेरी पाहायला मिळू शकते , तर 16 सप्टेंबरनंतर कोकणात कमी तीव्रतेने पाऊस सुरू राहू शकतो. 

विदर्भाच्या कोणत्या भागांना पावसानं झोडपलं? पूरस्थितीनं नागरिक बेजार

चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात दमदार पावसाने धरणे आणि नद्या यांच्यात मोठा पाणी संचय झाला. ज्यामुळं नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय. गेल्या 24 तासात चंद्रपूर शहर जिल्ह्यात 28 मिलिमीटर सरासरी पाऊस झाला.  यंदा आजपर्यंत वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 96.2% एवढा पाऊस नोंदला गेलाय.  सध्याही शहर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

 
तिथं सोलापूर जिल्ह्यात पावसाचा कहर पाहायला मिळत असून,  अक्कलकोट तालुक्यातील शिरशी गावात 100 हुन अधिक ग्रामस्थ अडकल्याचं वृत्त गुरुवारी समोर आलं. या गावाला चारही बाजूने पाऊस आणि ओढ्याच्या पाण्याने वेढा दिल्याने ग्रामस्थ अडकले. सुदैवाने गावात पाणी शिरलं नसल्याने सर्व ग्रामस्थ सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. 

अतिवृष्टीनं बळीराजा संकटात… 

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे. जिल्ह्यातील तब्बल 2 लाख हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या पंचनाम्यात उघड झाले आहे. धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 42 पैकी तब्बल 23 मंडळात अतिवृष्टी झाली असून, आतापर्यंत दोन लाख हेक्टर क्षेत्रातील शेती पिके पावसाच्या पाण्याखाली गेली आहेत. 

FAQ

राज्यात पावसाची सद्यस्थिती काय?
मुंबई आणि कोकणातील काही भागांमध्ये पावसानं विश्रांती घेतली असली, तरी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या मुंबई केंद्रानं पुढील 24 तासांत दक्षिण-मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. 

13 ते 15 सप्टेंबरचा अंदाज काय? 
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं की, 13 ते 15 सप्टेंबरदरम्यान अंतर्गत महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. यात मुंबई आणि जवळील किनारपट्टी भागांचा समावेश आहे. 

राज्यातील पर्जन्यमान थोडक्यात… 
पुढील 24 तासांपासून तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे, तर 16 सप्टेंबरनंतर कोकणात कमी तीव्रतेचा पाऊस सुरू राहील.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp