
भारतीय जनता पक्षाला लवकरच नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी आता प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार आहे. यासाठी रविंद्र चव्हाण यांनी आपला अर्ज केंद्रीय निरीक्षक किरेन रिजुजी यांच्याक
.
चंद्रशेखर बावनकुळे हे राज्य मंत्रिमंडळात मंत्री झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. भाजपच्या वतीने त्या दृष्टिकोनातून सर्व पावले देखील उचलण्यात येत होती. रवींद्र चव्हाण यांच्याच नेतृत्वातच अनेक पक्षप्रवेश राज्यात होत आहेत. आता रवींद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला असून, यांच्या अधिकृतरित्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या नियुक्तीची घोषणा एक जुलै रोजी होणार आहे.
चव्हाणांची युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून सुरुवात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांची स्तुती केली. राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी निवडणूक सुरु झाली आहे. यासाठी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आले आहेत. त्यांच्या समोर आम्ही रविंद्र चव्हाण यांचा प्रदेशाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. जे यापूर्वी मंत्री होते, त्यांनी युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली होती, त्यानंतर ते नगरसेवक झाले, नंतर आमदार झाले. आज प्रदेशाध्यक्ष पदासाठी आम्ही त्यांचा अर्ज दाखल केला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, मागच्या काळात चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून अतिशय चांगले काम केले आहे, त्यांनी चांगल्या प्रकारे संघटना बांधली, याचा परिणाम विधानसभा निवडणूकीत दिसून आला. त्यानंतर रवींद्र चव्हाण यांची कार्याध्यक्ष म्हणून काम केले. आज आम्ही त्यांचा अर्ज दाखल केला आहे. उद्या संध्याकाळी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल.
रवींद्र चव्हाण कोण आहेत?
रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते 2009 पासून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. अलीकडच्या निवडणुकीत तब्बल 50 हजारांहून अधिक मताधिक्य मिळवत विजयी झाले होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले होते. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली.
रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपने 2002 साली कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती. 2005 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवक झाले होते. 2007 मध्ये ते स्थायी समितीचे सभापती झाले. 2009 साली कल्याण विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. त्यानंतर झालेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी वर्चस्व मिळवले आणि मोठा विजय देखील मिळवला. त्यानंतर 2016 साली त्यांना राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदारकी मिळवण्याची हॅटट्रीक पूर्ण केली.
बावनकुळे 2022 पासून भाजप प्रदेशाध्यक्ष
चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑगस्ट 2022 मध्ये महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यभार हाती घेतला. ओबीसी चेहरा असणाऱ्या बावनकुळेंच्या नेतृत्वात पक्षाने 2024 च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 132 जागा जिंकून अभूतपूर्व यश मिळवले. बावनकुळे यांनी भाजपची स्थानिक पातळीवरील रचना मजबूत केली. 1.5 कोटी नवीन प्राथमिक सदस्य व 5 लाख सक्रिय कार्यकर्ते जोडण्यात यश मिळवले. बूथ स्तरापासून ते जिल्हा पातळीपर्यंत संघटनात्मक निवडणुका आणि नियुक्त्यांचे नियोजन केले. यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ 9 जागा मिळाल्या असल्या तरी, बावनकुळेंनी त्यातून धडा घेऊन विधानसभा निवडणुकीत बूथस्तरीय व्यवस्थापन करून भाजपला यश मिळवून दिले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.