digital products downloads

महाराष्ट्रातील विधवांना मोठा दिलासा, कौटुंबिक हक्कांसंदर्भात हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

महाराष्ट्रातील विधवांना मोठा दिलासा, कौटुंबिक हक्कांसंदर्भात हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

High Court On Widow: पतीच्या निधनानंतर विधवा महिलेचे कुटुंबात हाल होत असल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अनेकदा त्यांना स्वीकारले जात नाही, त्यांना त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करावा लागतो. अशा अनेक घटना समाजात वाढताना दिसतायत. पण आता हायकोर्टाने एका प्रकरणात सुनावणी करताना विधवा महिलांना मोठा दिलासा दिला आहे. काय आहे नेमकं प्रकरण? विधवांना कसा मिळणार दिलासा? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

विधवेला घरात राहण्याचा हक्क

पतीच्या निधनानंतर विधवेला त्याच्या घरात राहण्यास रोखणे हा कौटुंबिक हिंसाचार आहे, असे उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालात स्पष्ट केले. पतीच्या मालमत्तेत पत्नीचा हक्क असून, तिला तिथे राहण्यापासून वंचित करणे कायद्याने गुन्हा आहे. या प्रकरणात, पतीच्या बहिणीने विधवेला घरात प्रवेश नाकारला होता, परंतु न्यायालयाने विधवेच्या बाजूने निर्णय दिला. यामुळे विधवा महिलांना मोठा दिलासा मिळालाय.

काय होती बहिणीची याचिका?

पतीच्या निधनानंतर विधवा आपल्या हक्काच्या निवासस्थानात राहण्यासाठी गेली असता, पतीच्या बहिणीने त्याला विरोध केला. अतिरिक्त सत्र न्यायालयाने विधवेला राहण्याची परवानगी दिली होती. याविरोधात बहिणीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. उर्मिला जोशी-फणसाळकर यांच्या एकल पीठाने ही याचिका फेटाळून लावत विधवेचा हक्क कायम ठेवला.

न्यायालयाने काय नोंदवले निरीक्षण?

न्यायालयाने म्हटले की, पत्नी पतीसोबत राहत होती, हे कौटुंबिक नातेसंबंधात स्पष्ट आहे. भूतकाळात पती-पत्नी एकत्र राहत होते, याचा अर्थ ती त्याच्या कुटुंबाचा भाग आहे. त्यामुळे तिला घरात राहण्याचा पूर्ण हक्क आहे, असे न्यायालयाने नमूद केले.

बहिणीचा दावा काय होता?

बहिणीने केलेल्या दाव्यानुसार, 2004 नंतर विधवा तिच्या भावासोबत राहत नव्हती आणि त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यामुळे तिला घरात राहण्याचा हक्क नाही. मात्र, उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळला आणि विधवेला राहण्याचा हक्क बहाल केला. या निकालामुळे विधवांना त्यांच्या हक्काच्या मालमत्तेत राहण्याचा कायदेशीर आधार मिळाला आहे.

FAQ

1. हायकोर्टाने विधवेसंदर्भात कोणता महत्त्वाचा निर्णय दिला आहे?

उच्च न्यायालयाने नमूद केले आहे की, पतीच्या निधनानंतर विधवेला त्याच्या घरात राहण्यापासून रोखणे हा कौटुंबिक हिंसाचार आहे. पतीच्या मालमत्तेत पत्नीचा हक्क असून, तिला तिथे राहण्यास मनाई करणे कायद्याविरुद्ध आहे. या प्रकरणात, पतीच्या बहिणीने विधवेला घरात राहण्यास विरोध केला होता, परंतु न्यायालयाने विधवेच्या बाजूने निकाल दिला.

2. या प्रकरणात बहिणीने कोणता दावा केला आणि न्यायालयाने त्यावर काय निर्णय दिला?

पतीच्या बहिणीने दावा केला की, 2004 नंतर विधवा तिच्या भावासोबत राहत नव्हती आणि त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता, त्यामुळे तिला घरात राहण्याचा हक्क नाही. उच्च न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला आणि विधवेला पतीच्या घरात राहण्याचा पूर्ण हक्क असल्याचे स्पष्ट केले. न्या. उर्मिला जोशी-फणसाळकर यांच्या एकल पीठाने बहिणीची याचिका रद्द केली.

3. या निकालाचा विधवांवर काय परिणाम होईल?

हा निकाल विधवांसाठी महत्त्वाचा आहे, कारण यामुळे त्यांना पतीच्या मालमत्तेत राहण्याचा कायदेशीर हक्क मिळाला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, पतीसोबत भूतकाळात राहिलेली पत्नी कौटुंबिक नात्याचा भाग आहे आणि तिला घरात राहण्यापासून वंचित केले जाऊ शकत नाही. यामुळे विधवांना त्यांच्या हक्काच्या निवासस्थानात सुरक्षितपणे राहण्यासाठी कायदेशीर संरक्षण मिळेल.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp