digital products downloads

‘त्यांच्या तोंडात शेण कोंबलं आणि…’; राऊतांचा कदमांना टोला! बाळासाहेबांच्या मृत्यूच्या वेळेवरुन नवा वाद

‘त्यांच्या तोंडात शेण कोंबलं आणि…’; राऊतांचा कदमांना टोला! बाळासाहेबांच्या मृत्यूच्या वेळेवरुन नवा वाद

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना मेळाव्याच्या मंचावर पक्षाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूचा उल्लेख केला. यासंदर्भात खळबळजनक दावा करताना बाळासाहेबांच्या निधनाची घोषणा करण्याच्या दोन दिवस आधीच त्यांचा मृ्त्यू झाल्याचं म्हटलं आहे. आता या गंभीर टीकेला खासदार राऊतांनी उत्तर दिलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

रामदास कदम नेमकं काय म्हणाले?

“उद्धव ठाकरेंनी 30 वर्षं फक्त टक्क्यांचं राजकारण केलं. मला मुंबई महापालिकेत जाण्याचा अधिकार नव्हता अशी आमची अवस्था होती. उद्धव ठाकरेंना राजकारणात बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का?,” असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. “शिदेंना विनंती आहे की, शिवसेना प्रमुखांचे निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीत ठेवली? ही माहिती काढा. मी जबाबदारीने बोलत असून मोठं विधान करत आहे. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर यांना विचारा.  2 दिवस त्यांची बॉडी का ठेवली? काय अंतर्गत सुरु होतं?,’ असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.

बाळासाहेबांचे मृत्युपत्र कोणी तयार केलं?

“8 दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलो होतो, सगळं कळत होतं. पण हे सगळं कशासाठी सुरु होतं. कोणीतरी सांगितलं बाळासाहेब यांच्या हाताचे ठसे का घेतले? मातोश्रीत सगळी चर्चा सुरु होती. बाळासाहेब यांचे मृत्युपत्र कोणी तयार केलं? कधी झालं त्यावर कोणी सही केली? ही सगळी माहिती काढा,” असंही रामदास कदम म्हणाले आहेत. “शिवसेना आम्ही मोठी केली, तुम्ही काय शिकवता. ज्यांनी बाळासाहेबांना 50 वर्ष साथ दिली त्यांना संपवण्याच विडा उचलला आहे. बाळासाहेब गेल्यानंतर माझी शिवाजी पार्कातील भाषणं बंद झाली. कसली भीती वाटते?” अशी विचारणा रामदास कदमांनी केली.

कदमांना उत्तर देताना राऊत काय म्हणाले?

कदम यांनी केलेल्या या विधानांवर संजय राऊतांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया नोंदवली. “मी तिकडे होतो, हे नव्हते! तुम्ही तेव्हा लहान होता. तुम्ही पत्रकारितेमध्ये नव्हता. आम्ही मातोश्रीवर होतो. बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणात शेवटपर्यंत होतो. आम्हाला माहिती आहे. आता यांच्या (रामदास कदमांच्या) तोंडामध्ये कोणीतरी शेण कोंबलं असेल, भीतीपोटी ते उगाळत असतील तर तुम्ही आता काय करणार?” असा टोला संजय राऊत यांनी या विधानावरुन लगावला आहे. 

“शिवसेनाप्रमुखांना जाऊन एक दशक होत आहे. शिवसेनाप्रमुखांना 100 वर्ष आता होत आहेत. अशाप्रकारचे वक्तव्य करणे हा ज्या शिवसेनेने तुम्हाला आम्हाला मोठे केलं, त्या बाळासाहेब ठाकरेंशी बेईमानी करण्यासारखं आहे,” असं राऊत म्हणाले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp