digital products downloads

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎: हमीभावात कापूस विक्रीसाठी एकरी 12 क्विंटलची मर्यादा निम्म्यावर‎, अतिवृष्टीमुळे उत्पादन क्षमता घटल्याने शासनाचा निर्णय‎ – Nanded News

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:  हमीभावात कापूस विक्रीसाठी एकरी 12 क्विंटलची मर्यादा निम्म्यावर‎, अतिवृष्टीमुळे उत्पादन क्षमता घटल्याने शासनाचा निर्णय‎ – Nanded News


जिल्ह्यात सीसीआयच्या (भारतीय कापूस महामंडळ) ‎६ केंद्रांवर कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. मात्र, ‎शासनाच्या निर्णयानुसार यंदा एकरी ५ ते ६ क्विंटल ‎कापूस खरेदी करण्याची मर्यादा लागू करण्यात आली ‎आहे. ही मर्यादा मागील वर्षी सर्व जिल्ह्यांमध्ये एकरी १२

.

सध्या खुल्या बाजारात कापसाचे किमान दर ६१०० ते ‎कमाल दर ६४०० रूपये क्विंटला दर मिळत आहेत. ‎हमीभावापेक्षा हे दर कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ‎सीसीआयच्या खरेदी केंद्रावर क्विंटलला ७७१० ते ८११० ‎‎रूपयांच्या हमीभावाने कापूस विक्री करणे फायदेशीर ‎ठरत आहे. परंतू मर्यादित कापूस खरेदीच्या अटीमुळे ‎अनेक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत ‎‎असल्याचे चित्र आहे. काही भागात उत्पादन हेक्टरी १८ ते ‎२० क्विंटलपर्यंतही जाते. पण सीसीआय फक्त १३ ते १४ ‎‎क्विंटलच खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांना उर्वरित ‎‎कापूस कमी भावात खासगी व्यापाऱ्यांना विकण्याशिवाय ‎‎दुसरा पर्याय नाही.राज्यातील हवामान, पाऊस आणि ‎उत्पादन क्षमता यांचा एकत्रित विचार करूनच कापूस ‎‎खरेदीची मर्यादा निश्चित करण्यात आल्याचे ‎‎सीसीआयकडून सांगितले जात आहे. ‎

नोंदणी ८५०६ जणांची,‎प्रमाणीकरण फक्त २५३‎

१ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या‎कालावधीत ‘कपास किसान” या‎अॅपद्वारे शेतकऱ्यांना नोंदणी करता‎येणार आहे. गुरुवारपर्यंत ८५०६ पेक्षा‎जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली‎आहे. परंतु, नांदेड बाजार समितीने‎‎२५३ जणांचेच प्रमाणीकरण केले.‎

शासनाने घटवली मर्यादा‎

यंदा शासनाने राज्यात कापूस‎खरेदीची एकरी मर्यादा कमी केली.‎अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले‎आहे. त्यामुळे उत्पादनाची क्षमता‎घटली आहे. त्यामुळे हा निर्णय‎घेण्यात आला असावा, असे नांदेड‎कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव‎एम. टी. पाटील यांनी सांगितले.‎

सीसीआयच्या जाचक अटी, ७७१० ते ८११० रुपये हमीभाव‎

नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील सीसीआयच्या केंद्रावर कापूस खरेदीला‎सुरूवात झाली आहे. मुहूर्ताला ८ हजार ६० रूपये क्विंटलला भाव मिळाला.‎

बॅनरसमोर फोटो काढणे आवश्यक‎

ॲपमधील अटी शेतकऱ्यांना जाचक ठरत‎आहेत. तसेच तांत्रिक गोष्टींचे ज्ञान नसल्यामुळे‎अडथळा निर्माण होत आहे. शेतकऱ्यांना‎सीसीआयच्या बॅनरसमोर फोटो काढावा लागणार‎असून तेव्हाच त्यांचे बिल पास होणार आहे.‎तसेच शेतकऱ्यांना केंद्रावर हजर राहणे‎बंधनकारक असणार आहे. तसेच स्लॉट बुक‎झाल्यानंतर त्याच दिवशी शेतकऱ्यांना येण्यास‎जमले नाही तर, दोन वेळाच संधी दिली जाईल.‎त्यानंतर मात्र, संधी नसेल.‎

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp