digital products downloads

निवडणुकीपर्यंत एकत्र राहणार का? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट, ‘मी आणि राज महापालिका…’

निवडणुकीपर्यंत एकत्र राहणार का? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट, ‘मी आणि राज महापालिका…’

Uddhav Thackeray Raj Thackeray: आमचा म मराठीचा नाही तर महापालिकेचा आहे अशी टीका काहीजण करत आहेत. नुसता महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचाही आहे. आम्ही महाराष्ट्र काबीज करु असा निर्धार उद्धव ठाकरेंनी विजयी मेळाव्यात व्यक्त केला आहे. तसंच माझ्यात आणि राज ठाकरेंमध्ये भांडण लावून, नतद्रष्ट डोक्यावर बसत आहेत अशी टीकाही केली आहे. आपली ताकद एकजुटीत असली पाहिजे असं बाळासाहेबांनी सांगितलं आहे. संकट आलं की आपण मराठी एकवटतो, आणि संकट गेलं की आपणच एकमेकांत भांडू लागतो. आता हा नतद्रष्टपणा अजिबात करायचा नाही असंही ते म्हणाले आहेत.

“आपल्या दोघांमध्ये भांडण लावून, नतद्रष्ट डोक्यावर बसत आहेत. हे किती काळ सहन करायचं आहे? प्रत्येक वेळी काही झालं की भांडणं लावायची. आताही तेच होणार. म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? काहीजण म्हणतात यांचा म मराठीचा नाही तर महापालिकेचा आहे. नुसता महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचाही आहे. आम्ही महाराष्ट्र काबीज करु,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

 

आमच्या दोघात जो काही अंतरपाट होता तो अनाजी पंतांनी अंतर दूर केला. आता अक्षता टाकण्याची काही अपेक्षा नाही असा टोला त्यांनी नाव न घेता फडणवीसां लगावला. एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठी असं सूचक विधान यावेळी त्यांनी केलं. 

पुढे ते म्हणाले, “अनेक बुवा महाराज व्यग्र आहेत. कोण लिंब मारतंय, कोण टाचं मारतंय, कोणी गावी जाऊन अंगारे धुपारे करत असेल, रेडे कापत असतील. या सगळ्यांना सांगतो, आमच्या आजोबांनी या भोंदूगिरीविरोधात लढा दिला होता. आम्ही त्यांचे वारसदार म्हणून तुमच्यासमोर उभे ठाकले आहोत”.

“आज तर निवडणुका नाहीत. सत्ता येते आणि जाते, पण आपली ताकद एकजुटीत असली पाहिजे असं बाळासाहेबांनी सांगितलं आहे. संकट आलं की आपण मराठी एकवटतो, आणि संकट गेलं की आपणच एकमेकांत भांडू लागतो. आता हा नतद्रष्टपणा अजिबात करायचा नाही. गेल्या विधानसभेत त्यांनी बटेंगे तो कटेंगे केलं. हिंदू मुसलमान तर केलंच, पण खासकरुन मराठींमध्ये केलं. यांची निती अशीच आहे. गुजरातमध्ये पटेलांना एकत्र केलं. हरियाणात जाट एकत्र केले आणि महाराष्ट्रात मराठ्यांना उचकवलं आणि मराठेतर एकत्र केला. त्यांच्यात भिती निर्माण केली. मराठी माणूस मराठी माणसाशी भांडला आणि दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावर राज्य करु लागले आणि आपण त्यांच्या पालख्या वाहायच्या. पालख्यांचे भोई होणार की कधीतरी माय मराठीला पालखीत सन्मानाने बसवणार आहात?”, अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp