digital products downloads

‘पुढील दोन तासांत मुंबई…’, खचाखच भरलेल्या आझाद मैदानात जरांगेंचं भाषण; ‘जाळपोळ, दगडफेक…’

‘पुढील दोन तासांत मुंबई…’, खचाखच भरलेल्या आझाद मैदानात जरांगेंचं भाषण; ‘जाळपोळ, दगडफेक…’

Maratha Reservation Morcha Mumbai Manoj Jarange Speech: मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण (Arakshan) देण्याची मागणी करत थेट मुंबईत धडक देणारे मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटलांनी आझाद मैदानावर (Azad Maidan) आमरण उपोषण आंदोलन सुरु केलं आहे. कपाळाला गुलाल लागल्याशिवाय आपण इथून उठणार नाही, असा शब्द जरांगे पाटलांनी आपल्या समर्थक मराठा बांधवांना दिला आहे. जरांगे पाटलांनी सरकारने सहकार्य केल्याबद्दल सरकारचे आभार मानले आहेत. तसेच आपण चर्चेसाठी तयार असल्याचंही जरांगेंनी म्हटलं आहे. मनोज जरांगेंसोबत जवळपास साडेसहा हजार गाड्या मुंबईत दाखल झाल्यात. सरकारने गोळ्या घातल्या तरी आपण मागे हटणार नाही. मात्र तुम्ही समाजाच्या नावाला गालबोट लागेल असं कोणतंही कृत्य करु नका असं आवाहन जरांगेंनी समर्थकांना केलं आहे.

Add Zee News as a Preferred Source

शिवनेरी ते मुंबई…

गुरुवारी शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवसेने गडावरील माती कपाळी लावून जरांगेंनी मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु केला. मजल दरमजल करत जरांगे आणि त्यांच्यासोबतचा हजारो गाड्यांचा ताफा पहाटेच्या सुमारास नवी मुंबईत पोहोचला. मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर साडेनऊच्या सुमारास जरांगेंचा ताफा आझाद मैदानात पोहोचला. जरांगेंनी या वेळेस समर्थकांशी संवाद साधला.

डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय…

“सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून घरोघरातून मराठ्यांनी मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायचे ठरवलं होतं. आता आपल्याला सरकारने सहकार्य केलं आहे. त्याबद्दल आपण सरकारचे कौतुक केले. त्यामुळे आता तुम्हालाही सहकार्य करायचे आहे. पुढील दोन तासांत मुंबई मोकळी करा,” असं आवाहन जरांगेंनी समर्थकांना केलं. तसेच “कोणीही जाळपोळ, दगडफेक करायची नाही. मराठ्यांची मान खाली जाईल असं एकही पाऊल कुणी उचलायचं नाही. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून उठायचं नाही. आपण समाजाला न्याय देण्यासाठी इथे आलो आहोत. आपण शिकलो नाही, आपण लोकांच्या बुद्धीने चाललो त्यामुळे सत्तर वर्षे वाटोळे झालं हे मराठ्यांनी विसरू नका,” असं जरांगे समर्थकांना उद्देशून केलेल्या भाषणात म्हणाले.

नक्की वाचा >> फक्त मराठा आरक्षण नाही तर जरांगेंनी केल्यात ‘या’ 6 मागण्या; एक मागणी धनंजय मुंडेंसंदर्भात

पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन

जरांगेंनी गाड्या घेऊन आलेल्या समर्थकांना पोलिसांना सहकार्य करत पार्किंगसाठी ठरवून दिलेल्या जागी गाड्या लावण्याचं आवाहन केलं. जरांगेंनी कोणथ्याही पद्धतीची हुल्लडबाजी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असं समर्थकांना सांगितलं. तसेच शिस्तभंग करणाऱ्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही असा इशारच जरांगेंनी आंदोलनाच्या मंचावरुन दिला.

नक्की वाचा >> मनोज जरांगे आहेत तरी कोण? त्यांनी खरोखर जमीन विकली का? मराठ्यांसाठी लढणाऱ्या जरांगेंचा संपूर्ण Biodata

FAQ

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनाची सुरुवात कशी केली?
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले. त्यांनी “कपाळाला गुलाल लागल्याशिवाय इथून उठणार नाही” असा निर्धार व्यक्त केला आणि समर्थकांना शांततापूर्ण आंदोलनाचे आवाहन केले.

जरांगे यांचा मुंबई मोर्चा कसा सुरू झाला?
27 ऑगस्ट 2025 रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून जरांगे यांनी साडेसहा हजार गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईच्या दिशेने कूच केले. गुरुवारी (28 ऑगस्ट) शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानावरील माती कपाळी लावून त्यांनी प्रवास सुरू केला. 29 ऑगस्ट रोजी पहाटे नवी मुंबईत आणि सकाळी साडेनऊ वाजता आझाद मैदानावर ते पोहोचले.

सरकारबद्दल जरांगे यांनी काय म्हटलं?
जरांगे यांनी सरकारने आंदोलनाला परवानगी देऊन सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. त्यांनी समर्थकांना सरकारला सहकार्य करण्याचे आणि दोन तासांत मुंबई मोकळी करण्याचे आवाहन केले. तसेच, ते चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले, पण आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचे नमूद केले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp