digital products downloads

महाराष्ट्रातील ‘या’ हिल स्टेशनवर अचानक लाखो पर्यटकांची गर्दी झाली; वाहनांची 10 KM लांब रांग; अन्न, पाणी मिळेना…

महाराष्ट्रातील ‘या’ हिल स्टेशनवर अचानक लाखो पर्यटकांची गर्दी झाली; वाहनांची 10 KM लांब रांग; अन्न, पाणी मिळेना…

Chikhaldara Hill Station Maharashtra : लोणावळा, खंडाळा, माथेरान, महाबळेश्वर ही महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहेत. येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. अशातच आता महाराष्ट्रातील आणखी एक पर्यटनस्थळ गर्दीमुळे चर्चेत आले आहे.  महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे हिल स्टेशन पावसाळ्यात हिरवळ आणि पांढऱ्या धुक्याने वेढलेले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या शेवटी येथे मोठी गर्दी झाली होती. शुक्रवार ते रविवार दरम्यान सुमारे एक लाख पर्यटक येथे आले होते. ज्यामुळे संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. रविवारी परिस्थिती आणखी बिकट झाली, जेव्हा परतवाडा ते चिखलदरा पर्यंत सुमारे 10 किमी लांब वाहनांच्या रांगा लागल्या. परिस्थिती अशी होती की शेकडो पर्यटक त्यांच्या वाहनांमधून न उतरता परतले.

विदर्भाचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या व चारही बाजूंनी हिरवेगार जंगल, खोल दरी आणि उंच पहाड हे चिखलदराचे अतिशय सुंदर दृश्य पक्ष्याप्रमाणे आता  पर्यटकांना जमिनीपासून 3 हजार फूट उंच आकाशातून पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. चिखलदराचे हे दृश्य पर्यटकांना अनुभवण्यासाठी पॅरोमोटरिंगची सुविधा करण्यात आली आहे.  खोल दरीमध्ये उतरणे आणि डोंगरातील ट्रेकिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी साहसी पर्यटक नियमित चिखलदरासह मेळघाट्यात येत आहेत. त्यामुळे पॅरोमोटरिंगमुळे आता साहसी पर्यटकांना भिमकुंड येथील खोलदरीत, गाविलगड किल्ला, स्कायवाक पॉईंट, चिखलदरा शहर आणि येथील जंगल  उंच आकाशातून पाहण्याची मजा लुटता आहे. वन विभागामार्फत ही सुविधा करण्यात आली आहे. तसेच महाभारतात उल्लेख असलेल्या भीम कुंड धबधब्याच्या वरून सायकलिंग करण्याचा थरार पर्यटक अनुभवत आहे. हा धबधबा जमिनीपासून 3500 फूट आहे त्यामुळे पर्यटक या धबधब्याच्या वरून सायकलिंग करत आहे. दरम्यान सध्या चिखलदऱ्यात अल्हाददायक वातावरण निर्माण झाल्याने पर्यटकांनी तोबा गर्दी केली आहे.

धामणगाव गढीहून चिखलदरा येथे जाण्यासाठी आणि येण्यासाठी घाटंग मार्ग निश्चित करण्यात आला होता. परंतु लाखोंच्या गर्दीसमोर ही योजना पूर्णपणे अपयशी ठरली. शनिवारी रात्रीपासून ते रविवारी संध्याकाळपर्यंत परतवाडा, मोठा, नगर परिषद नाका आणि धामणगाव गढी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. गर्दी नियंत्रित करण्यात तसेच पर्यटन स्थळी सुव्यवस्था राखण्यात पोलिस आणि वन विभागाचे कर्मचारी पूर्णपणे थकले होते. धामणगाव गढीच्या चेकपोस्टवर सकाळपासूनच लांब रांगा लागल्या होत्या.

पर्यटकांच्या गर्दीचा परिणाम येथील स्थानिकांवर देखील झाला. रविवारी धामणगाव गढी परिसरात वाहतूक कोंडीत एक अंत्ययात्रा अडकली. कुटुंबातील सदस्यांना अंत्यसंस्कार स्थळापर्यंत सुमारे दोन किलोमीटर चालत जावे लागले. पर्यटन स्थळी इतकी गर्दी होती की अनेक पर्यटक त्यांच्या वाहनांमधूनही उतरले नाहीत. सलग 4 ते 5 तास रांगेत उभे राहिल्यानंतर पुढे जाण्याचा मार्ग न सापडल्याने अनेक पर्यटक मागे फिरले. 

स्थानिक दुकानदारांनी पर्यटकांची  लुट केली. एक समोसा 50 रुपयांना विकला गेला. स्वच्छ पाणी आणि शौचालये यासारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या, ज्यामुळे पर्यटकांमध्ये संताप निर्माण झाला. परतवाडा, अकोला, धामणगाव गढी आणि बैतुल रोड येथील सर्व हॉटेल्स, लॉज आणि ढाब्यांवर ‘हाऊसफुल’चे बोर्ड होते. हजारो पर्यटकांच्या गर्दीमुळे लोकांना जेवण ऑर्डर करण्यापासून ते जेवण घेण्यापर्यंत रेस्टॉरंटमध्ये तासन्तास वाट पहावी लागली.

 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp