digital products downloads

‘मुलगा पुण्यात 300 कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला ज्ञात नाही, हे पटतंय का?,’ अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी

‘मुलगा पुण्यात 300 कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला ज्ञात नाही, हे पटतंय का?,’ अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी

Ambads Danve demands resignation of Ajit Pawar: झी 24 तासने पार्थ पवारांचं जमीन गैरव्यवहार प्रकरण उजेडात आणल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. जमीन गैरव्यवहार प्रकरण आता पोलिसांपर्यंत गेलं असून, बावधन पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच मुद्रांक विभागाल सात दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे विरोधकांनी अजित पवारांना लक्ष्य केलं असून त्यांनी नैतिकतेच्या आधारे पदापासून दूर व्हावं अशी मागणी होत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनीही हीच मागणी केली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

अंबादास दानवेंनी काय म्हटलं आहे?

मुलगा पुण्यात 300 कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला ज्ञात नाही. आणि जेव्हा या मुलाचे वडील पुण्याचे पालकमंत्री आहेत. तुमचं तुम्हाला तरी पटतंय का हे बोलताना? असं आश्चर्य अंबादास दानवे यांनी पोस्टमधून व्यक्त केलं आहे. 

बाजार भावापेक्षा कमी दरात जमीन घेतली गेली आहे. खडसेंचा राजीनामा घेतला गेला होता. चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून तुम्हीही राजीनामा द्या अशी मागणीही त्यांनी केली आहे. न्या. झोटिंग समितीच्या धर्तीवर कोरेगाव पार्क प्रकरणातही समिती मुख्यमंत्री महोदयांनी नेमावी. अशी आमची स्पष्ट मागणी आहे असंही ते म्हणाले आहेत. 

पोलिसांकडून गुन्हा दाखल

जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुद्रांक शुल्क विभागाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानंतर बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीसीपी विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भातील माहिती दिली. दिग्विजय पाटील, शितल तेजवानी आणि रवींद्र तारू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सध्या तरी पार्थ पवार यांचे नाव फिर्यादीने तक्रारीत दिलेले नाही त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. आपसात संगनमत करून शासनाची फसवणूक केल्याचा कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. स्टँम्प ड्युटी बुडवल्याचा तपास होईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

शीतल तेजवानी पॉवर ऑफ अटर्नी आहेत. त्यांन जमीन खरेदी लिहून दिली आहे. लिहून घेणारे दिग्विजय यांना आरोपी करण्यात आलं आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार अधिकचा तपास केला जाईल. तारू हे सब रजिस्ट्रार होते असंही पोलिसांनी सांगितलं. 

मुख्यमंत्र्यांनी जरुर चौकशी करावी – अजित पवार

“मुख्यमंत्र्यांनी जरुर चौकशी करावी. त्यांचा तो अधिकार आहे. जर उद्या कोणत्याही बाबतीत कोणी तक्रार केली तर चौकशी करुन त्याची शहानिशा करणं, सत्यता पडताळणं आणि काय नक्की घडलं आहे हे पाहणं हे  सरकारचं कामच आहे. मी दिवसभर येथे असल्याने त्याची माहिती घेतली नाही. मी माहिती घेऊन उद्या संध्याकाळी भेटेन. काय झालं, कसं झालं. कागदपत्रं कायदेशीर आहेत का? नियमात बसतात का? सगळ्यांची माहिती घेईन वस्तुस्थिती समोर मांडेन,” असं अजित पवार म्हणाले आहेत. 

‘अशा पद्धतीचं काहीतरी सुरु असल्याचं माझ्या कानावर आलं’

“तीन ते चार महिन्यांपूर्वी अशा पद्धतीचं काहीतरी सुरु असल्याचं माझ्या कानावर आलं होतं. तेव्हा मी असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असं सांगितलं होतं. कोणत्याही चुकीच्या गोष्टी कोणीही करु नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिल्या होत्या. त्यानंतर परत काय झालं मला माहिती नाही. आता वेगवेगळ्या जमिनीबद्दल बरंच काही सांगितलं जातं. त्याची इत्यंभूत माहिती घेणार आहे की कोणती कागदपत्रं आहेत कोणती नाही, कोणी परवानगी दिली, कोणी नाही,” असंही अजित पवारांनी सांगितलं. 

पुढे ते म्हणाले की, “मी आजपर्यंत मी जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांसंदर्भात फायदा होण्यासाठी एकाही अधिकाऱ्याला फोन केलेला नाही किंवा सांगितलेलं नाही. उलट मी यानिमित्ताने अधिकारी, कर्मचाऱ्यांना जर माझ्या नावाचा वापर करुन कोणी चुकीचं करत असेल किंवा नियमात न बसणारं करत असेल तर माझा पाठिंबा नसेल असं सांगत आहे. मी कायद्याच्या, नियमाच्या चौकटीत राहून काम कऱणारा कार्यकर्ता आहे”. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp