digital products downloads

संघर्ष आमच्या पाचवीलाच पुजलेला: धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांपुढे व्यक्त केली मनातील वेदना; परळीकडे लक्ष देण्याचीही केली मागणी – Nanded News

संघर्ष आमच्या पाचवीलाच पुजलेला:  धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांपुढे व्यक्त केली मनातील वेदना; परळीकडे लक्ष देण्याचीही केली मागणी – Nanded News


सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी संघर्ष आपल्या कुटुंबाच्या पाचवीलाच पुजलेला असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे व्यक्त केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला अटक झाल्यानंतर धनंजय मुंड

.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी लातूर येथे भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी आयोजित समारंभात बोलताना धनंजय मुंडे यांनी उपरोक्त विधान केले. गोपीनाथ मुंडे यांच्या पाचवीलाच संघर्ष पुजलेला होता. तसाच संघर्ष आमच्याही कुटुंबाच्या पाचवीला पुजलेला आहे. मी सावलीसारखा अगदी पहिल्या संघर्ष यात्रेपासून मुंडे साहेबांचा संघर्ष पाहिला आहे. गोपीनाथ मुंडे यांनी फक्त आणि फक्त सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठीच संघर्ष केला, असे ते आपले चुलते गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढताना म्हणाले.

गोपीनाथ मुंडेंनीच फडणवीसांना पुढे आणले

2011 मध्ये भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक होणार होती. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे पहिले नाव घेतले. त्यानंतर संघटना बांधणीसाठी त्यांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला. मुंडे साहेब मुख्यमंत्री व्हावेत अशी आपल्या सर्वांची इच्छा होती. पण दुर्दैवाने ते आपल्यातून लवकर गेले. पण त्यांचा आशीर्वाद असणारे देवेंद्र फडणवीस या राज्याचे एकदा नव्हे तर तीनदा मुख्यमंत्री झाले. एखादा कर्तत्ववान कार्यकर्ताही मुख्यमंत्री होऊ शकतो हे फडणवीस यांनी सिद्ध केले.

परळी मतदारसंघ लातूरच्या बाजूलाच आहे. त्यामुळे तुम्ही तिकडेही लक्ष द्यावे. तुम्ही आहात, बाजूला पंकजा ताई, जयकुमार गोरे व शिवेंद्रराजे भोसलेही आहेत. तुमचे मन राजासारखे आहे. तुमच्याशिवाय वाडीवस्त्याचा विकास होऊ शकणार नाही, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

स्वतःला जाणते राजे म्हणतात, पण…

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.अनेकजण स्वतःला जाणते राजे म्हणवून घेतात. पण देवेंद्र फडणवीस हे खऱ्या अर्थाने लोकांची सेवा करणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या हस्ते आज गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण झाले, असे ते म्हणाले.

हे ही वाचा…

उपराष्ट्रपतींचे डायरेक्ट ऑपरेशन केले का?:उद्धव ठाकरे यांचा केंद्राला सवाल; फडणवीस हे ‘चीफ’ नव्हे तर ‘थीफ मिनिस्टर’ असल्याचा टोला

मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड गायब झाल्यावरून केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. पण आजतागायत त्यांचा पत्ता लागला नाही. त्यांच्यावर कोणत्या रुग्णालयात व कोणता डॉक्टर उपचार करत आहे? की सरकारने डायरेक्ट त्यांचे ऑपरेशनच करून टाकले? असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना चाय पे चर्चा सारखी महाराष्ट्रात सर्वत्र भ्रष्टाचार पे चर्चा सुरू करण्याचेही आवाहन केले. वाचा सविस्तर

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp