digital products downloads

अकोल्यात कावीळ आजाराचे थैमान,‎ 12 दिवसांतच रुग्णांची संख्या 363: आतापर्यंत तालुक्यात 2 बालकांचा मृत्यू, खासगी दवाखाने रुग्णांनी हाऊसफुल्ल‎ – Ahmednagar News

अकोल्यात कावीळ आजाराचे थैमान,‎ 12 दिवसांतच रुग्णांची संख्या 363:  आतापर्यंत तालुक्यात 2 बालकांचा मृत्यू, खासगी दवाखाने रुग्णांनी हाऊसफुल्ल‎ – Ahmednagar News


राजूर ग्रामीण रुग्णालयात बालकाची विचारपूस करताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे.‎

तालुक्यातील राजूर, विठे व परिसरातून २३ ‎‎एप्रिलपासून कावीळ साथीचे थैमान सुरू‎आहे. रविवारपर्यंत (४ मे) काविळीच्या ‎‎रुग्णांची संख्या २६३ वर गेली होती. शिवाय ‎‎खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्ण‎व तालुक्याबाहेरील रुग्णालयात उपचार‎घेणारे रुग्णांची सं

.

दरम्यान, दिवसेंदिवस रुग्णांची वाढती ‎संख्या लक्षात घेऊन जलसंपदा मंत्री‎राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी‎राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रत्यक्ष भेट‎देऊन रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांशी संवाद‎ साधला. वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर चर्चा‎करून उपचारांची माहिती घेतली. दूषित‎पाण्यामुळे निर्माण झालेल्या कावीळ‎साथरोग पार्श्वभूमीवर अशी परिस्थिती‎कोठेही उद्भवू नये, यासाठी अहिल्यानगर‎जिल्ह्यातील सर्व ठिकाणांच्या जलस्त्रोतांची ‎तपासणी तातडीने करण्याची सूचना विखे‎यांनी प्रशासनास केली आहे. राजूर‎ परिसरातील कावीळ साथ नियंत्रणात ‎आणण्याची व आलेले संकट रोखण्याची ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎नागरिक व प्रशासनासह आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगून ग्रामस्थ व‎ प्रशासनाने परस्परांमधील समन्वयाने हे‎ कार्य करण्याचे आवाहन मंत्री विखे यांनी ‎केले.

यावेळी आमदार डाॅ. किरण लहामटे,‎माजी आमदार वैभव पिचड यांच्यासह‎राजूर ग्रामस्थ व विविध सामाजिक‎संघटनांच्या प्रतिनिधी, राजकीय‎पदाधिकाऱ्यांसोबत मंत्री विखे यांनी राजूर‎येथे कावीळ प्रतिबंधात्मक ‎उपाययोजनांबाबत बैठक घेतली. राजूरमध्ये‎ दूषित पाण्यानेच कावीळ साथरोग‎ नियंत्रणात येत नसल्याचा आरोप‎ ग्रामस्थांनी केला.

बैठकीत पालकमंत्र्यांनी‎ ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेतल्या.‎दरम्यान, झालेल्या चर्चेतून समोर आलेले ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎वास्तवादी मुद्दे लक्षात घेऊन कावीळ साथ ‎‎आटोक्यात आणण्याच्या पार्श्वभूमीवर ‎‎पालकमंत्री विखे यांनी तातडीने प्रशासनास ‎‎सर्वतोपरी उपाययोजना राबवण्याचे आदेश ‎‎दिले. त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना ‎‎विनाविलंब पुरवण्यासाठी राजूर येथे ‎वैद्यकीय अधिकाऱ्यांची स्वतंत्र टीम पूर्ण‎वेळ तैनात राहणार आहे. कावीळग्रस्त व ‎‎संशयीत रुग्णांच्या रक्त तपासणी ‎अहवालात होणारी दिरंगाई दूर करण्यासाठी ‎‎प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून विशेष ‎‎यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले‎ आहेत. माजी आमदार वैभव पिचड,‎ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा‎परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी‎आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ बाळासाहेब कोळेकर, जिल्हा ‎शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण,‎जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब‎ नागरगोजे, प्रकल्पाधिकारी देवकन्या‎ बोकडे, विनय सावंत उपस्थित होते.‎

आशा सेविकांमार्फत सर्वेक्षण‎

तालुक्यातील तलाठी व ग्रामसेवक ‎मुख्यालयी अनुपस्थित राहत असल्याची‎तक्रार ग्रामस्थांनी केली. त्याची दखल‎घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी‎प्रशासनातील सर्व अधिकारी व‎कर्मचाऱ्यांनी कावीळ साथ आटोक्यात‎येईपर्यंत मुख्यालय सोडू नये. कोविडचा‎अनुभव लक्षात घेता, आशा‎सेविकांमार्फत राजूर व शेजारील‎गावांमधील कुटुंबाचे सक्रीय सर्वेक्षण‎करण्याचे निर्देश दिले. रुग्णांचे रक्तनमुने‎तपासणीसाठी प्रवरा मेडिकल ट्रस्टचे‎विशेष पथक कार्यरत करून राजूर ग्रामीण‎रुग्णालयातून प्राथमिक उपचार सुविधा‎सुरू करण्यात आल्या. पाण्यात‎जंतुनाशक औषधांचा वापर व रक्त‎तपासणीसाठी लागणारी यंत्रणा जिल्हा‎नियोजन व विकास समितीच्या‎माध्यमातून तातडीने उपलब्ध करून‎देण्याचे आदेश विखे यांनी दिले आहेत.‎

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp