digital products downloads

‘अजित पवारांचे पुढे कोणतेही विधी होणार नाहीत’, कुटुंबाकडून काय सांगण्यात आलं? जाणून घ्या!

‘अजित पवारांचे पुढे कोणतेही विधी होणार नाहीत’, कुटुंबाकडून काय सांगण्यात आलं? जाणून घ्या!

Ajit Pawars Dashkriya Vidhi: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीकडे जात असताना विमान अपघातात मृत्यू झाला. हे विमान क्रॅश होऊन स्फोट झाले, ज्यात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा जीव गेला. हा अपघात बारामती विमानतळाजवळ घडला. या घटनेने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. पवार कुटुंब आणि राजकीय वर्तुळात मोठा धक्का बसला. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते आणि महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे मोठे योगदान होते. या अपघाताची चौकशी सुरू आहे. दरम्यान यापुढे अजित पवारांचे कोणते विधी होणार नाहीत, असे सांगितले जात आहे. याबद्दल जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

आवश्यक धार्मिक विधी

अपघातानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 29 जानेवारीला बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अजित पवार यांचा अंत्यसंस्कार पूर्ण राजकीय सन्मानाने करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने नेते, कार्यकर्ते आणि सामान्य लोक उपस्थित होते. अंत्यसंस्कारानंतर 30 जानेवारीला करहा आणि नीरा नद्यांच्या संगमावर सोंगाव येथे अस्थी विसर्जन करण्यात आले. या वेळी कुटुंबीयांनी प्रगतिशील दृष्टिकोन ठेवून सर्व आवश्यक धार्मिक विधी तीन दिवसांत उरकले. यामुळे पारंपरिक रूढींना वेगळा वळसा देण्यात आल्याचे दिसून आले.

पुढील विधी न करण्याचा निर्णय

पवार कुटुंबाने दशक्रिया आणि तेरावा हे विधी न करण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवारांचे कोणतेही पुढील विधी होणार नाहीत, असे श्रीनिवास पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. अस्थी विसर्जनाच्या वेळीच सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. कुटुंबीयांनी या विधी घरीच खासगी पद्धतीने करणार असल्याचे सांगितले. यामुळे लोकांना या विधींमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार नाही.

श्रद्धांजली सभा

3 फेब्रुवारी 2026 रोजी बारामतीतील काटेवाडी येथील अजित पवारांच्या निवासस्थानी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. सकाळपासून नेते आणि सामान्य लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत. दुपारी 4 वाजेपर्यंत कुटुंबीय श्रद्धांजली स्वीकारत आहेत. या सभेत अजित पवारांच्या कार्याची आठवण काढली जात आहे. पवार कुटुंबाने या वेळी कोणतेही मोठे धार्मिक विधी न करता फक्त श्रद्धांजली घेण्यावर भर दिला आहे. 

पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद 

अजित पवारांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी 3 जानेवारीला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्या नुकत्याच कराड येथील यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला भेट देऊन परतल्या. आता त्यांचा मुलगा पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवण्याची चर्चा आहे. त्यांचा मार्ग मोकळा असून, पूर्ण सहा वर्षांच्या मुदतीसाठी ते निवडले जाऊ शकतात. सुनेत्रा पवारांची मुदत 4 जुलै 2028 पर्यंत होती पण ही जागा लवकरच भरली जाईल.सुनेत्रा पवार यांच्याकडेच पुणे आणि बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही पालकमंत्रिपदं रिक्त झाली होती.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp