
अजित पवार यांच्या अपघाती विमान दुर्घटनेनंतर तपास यंत्रणांनी आता निर्णायक टप्प्यात प्रवेश केला आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जाणारा ब्लॅक बॉक्स अखेर तांत्रिक पातळीवर तपासासाठी सक्रिय करण्यात आला असून त्यातील माहिती रिकव्हर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या घडामोडीमुळे अपघाताच्या नेमक्या कारणांबाबत स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता वाढली आहे. तपास यंत्रणांकडून अत्यंत दक्षतेने आणि प्रोटोकॉलनुसार ही प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती समोर येत आहे. विमान अपघातानंतर घटनास्थळावरून मिळालेल्या अवशेषांमध्ये ब्लॅक बॉक्स सुरक्षित अवस्थेत सापडल्याने तपासाला मोठी दिशा मिळाली होती. मात्र, त्यातील डेटा उघडणे ही अत्यंत संवेदनशील आणि तांत्रिक प्रक्रिया असल्याने ती विशेष तज्ञांच्या देखरेखीखाली सुरू करण्यात आली आहे. ब्लॅक बॉक्समध्ये विमानाच्या उड्डाणादरम्यानची सर्व तांत्रिक माहिती, इंजिनची स्थिती, पायलट आणि कंट्रोल रूममधील संवाद, तसेच शेवटच्या क्षणांतील नोंदी साठवलेल्या असतात. त्यामुळे या डेटाचे विश्लेषण अपघाताच्या मूळ कारणांचा शोध घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवला आहे. केंद्राच्या AAIB विभागाने ब्लॅक बॉक्स जप्त केला आहे. यातील माहितीवरून अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल. कंपनीच्या मालकांवर कडक कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, ब्लॅक बॉक्समधील माहिती व्यवस्थितरीत्या मिळवण्यासाठी विशेष प्रयोगशाळेत उच्च तांत्रिक साधनांचा वापर केला जात आहे. डेटा खराब झालेला नसल्याची प्राथमिक खात्री मिळाल्यानंतरच रिकव्हरीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेदरम्यान प्रत्येक टप्प्यावर काळजी घेतली जात असून, कोणतीही माहिती नष्ट होऊ नये यासाठी विशेष खबरदारी बाळगली जात आहे. संबंधित तज्ञांची टीम या कामात गुंतलेली आहे. या अपघाताने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले होते. अजित पवार यांच्यासह विमानातील अन्य प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर अपघाताची नेमकी कारणे काय होती, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. हवामानातील बदल, तांत्रिक बिघाड, लँडिंगदरम्यानची अडचण अशा अनेक शक्यतांवर चर्चा होत होती. मात्र, आता ब्लॅक बॉक्समधील अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच या सर्व प्रश्नांची शास्त्रीय उत्तरे मिळू शकणार आहेत. तपास यंत्रणांकडून या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जात आहे. ब्लॅक बॉक्समधील माहितीचे विश्लेषण झाल्यानंतर एक सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे. या अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर आणि तांत्रिक निर्णय घेतले जाणार असल्याचे समजते. अपघातास कारणीभूत ठरलेल्या घटकांबाबत स्पष्टता आल्यास भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखण्यासही मदत होणार आहे. निष्कर्ष जाहीर झाल्यानंतरच अपघाताचे खरे कारण समोर दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात या तपासाची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यांच्या कुटुंबीयांसह कार्यकर्ते आणि नागरिकांना अपघाताचे नेमके कारण समजावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ब्लॅक बॉक्समधील माहिती या अपेक्षांना काही प्रमाणात उत्तर देऊ शकेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. ब्लॅक बॉक्स डेटा रिकव्हरीची प्रक्रिया सुरू झाल्याने तपासात नवे वळण आले आहे. आता सर्वांचे लक्ष या प्रक्रियेच्या निष्कर्षांकडे लागले आहे. अधिकृतरीत्या निष्कर्ष जाहीर झाल्यानंतरच अपघाताचे खरे कारण समोर येईल, मात्र सध्या सुरू असलेली ही तांत्रिक तपासणी या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाची पायरी मानली जात आहे. एसआर व्हेंचर्स कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आधीच ब्लॅकलिस्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरलेला असतानाच, या प्रकरणातील विमान कंपनी ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ बाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. युरोपियन हवाई नियामक संस्था EASA ने या कंपनीची ‘थर्ड कंट्री ऑपरेटर’ (TCO) अधिकृतता एक वर्षापूर्वीच निलंबित केली होती. सुरक्षेच्या अत्यंत गंभीर त्रुटी आणि तपासात असहकार्य केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती, तरीही ही कंपनी भारतात सेवा कशी देत होती, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



