
Ramdas Kadam: शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषदेत माजी मंत्री अनिल परब यांच्यावर थेट टीकास्त्र सोडले. “अनिल परब हे अर्धवट वकील आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वतःच्या अज्ञानाचे प्रदर्शन केले.” कदम यांनी डॉक्टरांच्या संदर्भात परबांच्या टिप्पणींवरून प्रश्न उपस्थित केले. “मी डॉक्टरांचा उल्लेख केला होता, अनिल परब हे त्या डॉक्टरांवरही दावा करणार का?” असा प्रश्न त्यांनी विचारला.
कदम यांनी १९९३ मध्ये पत्नीच्या आत्महत्येच्या प्रकरणावरूनही संताप व्यक्त केला. “माझी पत्नी खेडला स्वयंपाक करत होती, तेव्हा दोन मजल्याचा भडका उडाला. हे मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. मी याविरोधात १०० टक्के न्यायालयात जाईन,” असे ते म्हणाले.
तसेच, डान्सबार प्रकरणावरून स्पष्टीकरण देत, “तो बार नव्हता, ऑर्केस्ट्रा होता. विक्षिप्त हावभाव करणाऱ्या मुलीमुळे आम्ही करारनामा रद्द केल्याचे रामदास कदम म्हणाले.
आता मी CBI चौकशीची मागणी करतोय.” उद्धव ठाकरे व कदम यांच्यावर परबांच्या टीकेला प्रत्युत्तर देत कदम यांनी, “बाळासाहेब गेल्यानंतर त्यांनी मला बोलू दिले का? मंत्रिपद काहीतरी द्यायचे म्हणून दिले, नाईलाज होता म्हणून घेतले. अनिल परबला मातोश्रीचा हिस्सा दिलाय का?”
चंद्रग्रहणाच्या रात्री वरळी स्मशानभूमीत बकरा कापल्याचा आरोप रामदास कदमांनी केला. “दोन नंगे बाबा होते, आणि रामदास कदम आणि त्यांच्या मुलाचे नाव घेऊन बकरा कापल्याचे रामदास कदम म्हणाले.
तसेच, “जे मृत्युपत्र झाले त्याच्याशी माझा संबंध नाही. मी ५० वर्षे मातोश्रीवर काढली. याप्रकरणी स्वतः उद्धव ठाकरे बोलावेत, चेले-चमचे बोलू नयेत.” बाळासाहेबांच्या पार्थिवासोबत ‘गद्दारी’चा आरोप करत कदम म्हणाले, “तूच नामक हराम गद्दारी केली.
जसलोकमध्ये साहेब स्वतः आले होते, माझी बदनामी करू नका.” उद्या मुख्यमंत्र्यांना भेटून CBI चौकशीची मागणी करणार असल्याचे सांगत, “माझी महाराष्ट्रात मानहानी झाली. ह्या गडद्याला काय माहित? मी उद्धवांना सांगितले बाळासाहेब दैवत आहेत, तर ते म्हणाले त्यांचे हाताचे ठसे आहेत. आता अनिल परब मातोश्रीचा मालक झाला आहे का?” जयदेव थोरात यांच्या आक्षेपाकडेही लक्ष वेधले. या वादाने शिवसेनेत आणखी खळबळ उडाली असून, परब यांनी प्रत्युत्तर देत कदमांच्या स्विस बँक अकाऊंट व पत्नी प्रकरणावर नार्को टेस्टची मागणी केली आहे.
FAQ
प्रश्न: रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर कोणते आरोप केले आहेत?
उत्तर: रामदास कदम यांनी अनिल परब यांना ‘अर्धवट वकील’ संबोधत त्यांच्या पत्रकार परिषदेत ‘अज्ञानाचे प्रदर्शन’ केल्याचा आरोप केला. तसेच, परब यांनी डॉक्टरांबाबत केलेल्या टिप्पणीवरून त्यांच्यावर दावा करण्याचा प्रश्न उपस्थित केला. कदम यांनी परब यांना मातोश्रीचा मालक बनल्याचा टोमणा मारला आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतः बोलावे, चमचे बोलू नयेत, असे म्हटले.
प्रश्न: १९९३ च्या पत्नीच्या आत्महत्येच्या प्रकरणावर कदम यांचे काय म्हणणे आहे?
उत्तर: कदम यांनी सांगितले की, त्यांची पत्नी खेडला स्वयंपाक करत असताना दोन मजल्याचा भडका उडाला, आणि हा बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. याविरोधात ते १०० टक्के न्यायालयात जाणार असून, CBI चौकशीची मागणी करणार आहेत. तसेच, त्यांनी आपल्या पत्नीच्या प्रकरणावरून झालेल्या मानहानीविरोधात कायदेशीर कारवाईची घोषणा केली.
प्रश्न: डान्सबार आणि चंद्रग्रहणाच्या रात्रीच्या आरोपांवर कदम यांचे स्पष्टीकरण काय आहे?
उत्तर: कदम यांनी डान्सबार प्रकरणावर स्पष्ट केले की, तो बार नव्हता, तर ऑर्केस्ट्रा होता, आणि एका मुलीच्या विक्षिप्त हावभावामुळे तो बंद करण्यात आला. चंद्रग्रहणाच्या रात्री वरळी स्मशानभूमीत बकरा कापल्याच्या आरोपाचे खंडन करत, “मी तिथे नव्हतो, दोन नंगे बाबा होते, हे चुकीचे आहे,” असे ते म्हणाले. याप्रकरणीही ते CBI चौकशी आणि कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.