
अमरावती जिल्ह्यात गुरुवारी दुसऱ्या दिवशीही पावसाने थैमान घातले. बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ८५ घरांची पडझड झाली आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील २६ कुटुंबांतील ९६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले.
.
अमरावती तालुक्यात सर्वाधिक ३८ घरांची पडझड झाली. धामणगाव रेल्वे तालुक्यात १३ आणि तिवसा तालुक्यात १० घरांचे नुकसान झाले. अचलपूर तालुक्यात ८ घरे अंशतः बाधित झाली. मोर्शी व दर्यापूर तालुक्यात प्रत्येकी ५ घरे कोसळली. अमरावती, अंजनगाव सुर्जी व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात प्रत्येकी २ घरांची पडझड झाली.
शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. तिवसा तालुक्यात १६० हेक्टर आणि दर्यापूर तालुक्यात २६ हेक्टर अशा एकूण १८६ हेक्टर क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली. कापूस, सोयाबीन, तूर आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले.
चांदूर रेल्वे तालुक्यात सर्वाधिक १०७.१ मिमी पाऊस झाला. धामणगाव रेल्वे तालुक्यात १०६ मिमी तर अमरावतीत ७१.७ मिमी पाऊस नोंदवला गेला. प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू केले असून, स्वातंत्र्यदिनानंतर अंतिम नुकसानीचा अहवाल तयार होणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.