digital products downloads

अमरावती-भातकुलीत शेतीचे मोठे नुकसान: काँग्रेसची प्रतिहेक्टर 50 हजार रुपयांच्या मदतीची मागणी – Amravati News

अमरावती-भातकुलीत शेतीचे मोठे नुकसान:  काँग्रेसची प्रतिहेक्टर 50 हजार रुपयांच्या मदतीची मागणी – Amravati News


अमरावती आणि भातकुली तालुक्यात अलीकडे झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश पावसामुळे शेती आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

.

16 ते 19 ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर आणि कापूस या पिकांचे 50 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी हरिभाऊ मोहोड, अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिश मोरे आणि श्रीकांत बोंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

सतत पडणाऱ्या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले आहेत. अनेक शेतांमध्ये अजूनही पाणी साचून आहे. काही गावांतील घरे आणि गोठे वाहून गेले आहेत. रस्ते खराब झाल्याने दळणवळण ठप्प झाले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रति हेक्टर 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या निवेदनात रस्ते दुरुस्ती आणि नाला खोलीकरणाची मागणीही करण्यात आली आहे. मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हरिभाऊ मोहोड आणि हरिश मोरे यांनी दिला आहे. शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे साधन नसलेल्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अडचणीत आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

तिवसा तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

तिवसा तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर, कापूस, मूग, उडीद यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

तालुक्यातील निंभोरा, डेहनी, शेंदुरजनाबाजार, वरखेड, मोझरी, अनकवाडी, शिरजगाव मोझरी, सालोरा आणि धोत्रा या गावांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे शेती पिके उद्ध्वस्त झाली आहेत. वीज पडून काही जनावरे दगावली असून अनेक घरांची पडझड झाली आहे.

युवा स्वाभिमान पार्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन तिवसाचे तहसीलदार यांना देण्यात आले. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदन सादर करताना पार्टीचे उपाध्यक्ष पवन भोजने, जिल्हा सचिव संदेश मेश्राम, तालुका अध्यक्ष कुणाल कडू यांच्यासह प्रवीण लादे, तुषार राउतकर, हरिचंद्र डांगे, निलेश निवल, प्रिया गणोरकर, सचिन चौधरी, भूषण हरणे, संदीप चौधरी आणि अनेक शेतकरी उपस्थित होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp