digital products downloads

अमरावती विद्यापीठात पर्यावरण, ऊर्जा व जल संवर्धन विषयावर जनजागृती कार्यक्रम: पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे – डॉ. डी.बी. मालपे – Amravati News

अमरावती विद्यापीठात पर्यावरण, ऊर्जा व जल संवर्धन विषयावर जनजागृती कार्यक्रम:  पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे – डॉ. डी.बी. मालपे – Amravati News


आपल्या देशात गेल्या साठ वर्षात मोठ्या प्रमाणावर आपण वनाचा विनाश केला असून त्यामुळे झालेली निसर्गहानी भरुन निघावी, शाश्वत विकास व्हावा, याकरता पर्यावरणाचे महत्व विद्यार्थ्यांनी समजून घेवून त्याच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन नागपुरच्या

.

प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) अंतर्गत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील प्रादेशिक समन्वय संस्था, उन्नत भारत अभियान, राष्ट्रीय सेवा योजना व रासायनिक तंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यावरण, ऊर्जा व जल संवर्धन’ या विषयावर एक दिवसीय जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या डॉ. श्रीकांत जिचकार स्मृति संशोधन केंद्राच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे होते. तर कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, उन्नत भारत समन्वयक डॉ. एम.बी. कुंभारे, रा.से.यो. संचालक डॉ. नीलेश कडू, रासायनिक तंत्रशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनिल नाईक, भूगर्भशास्त्र विभागप्रमुख डॉ. यादवकुमार मावळे उपस्थित होते.

डॉ.डी.बी. मालपे पुढे म्हणाले, आपल्या वेदपुराणामध्ये निसर्गाचे महत्व सांगितले आहे. पण आपण ते विसरलो आणि विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची व निसर्गाच्या संपत्तीची मोठी हानी केली. निसर्गामध्ये प्रत्येक जीव निसर्गचक्र सुरु ठेवण्याकरता महत्वाचा आहे. त्याचे जतन झाले पाहिजे, याकरता आपल्या पुराणामध्ये विविध देवतांच्या व पूजेच्या माध्यमातून त्याचे महत्व सांगितले आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अलनिनोच्या परिणामात वर्षागणिक वाढ होत आहे. कधी ढगफुटी होते, तर कधी दुष्काळ पडतो. हे सगळे परिणाम मोठ्या प्रमाणावर झालेल्या जंगलतोडीचे आहेत. जंगलतोडीमुळे कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढले आहे. अंटार्टिकावर असलेला शुद्ध पाण्याचा राखीव बर्फ वितळत आहे, त्यामुळे भविष्यात समुद्राची जलपातळी वाढून अनेक शहरे डुबण्याची शक्यता आहे. पर्यावरण, उर्जा व जल संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी पुढे येण्याची खरी गरज आहे. मोठ्या प्रमाणावर झाडे लावणे, जल संवर्धनासाठी समाजामध्ये जनजागृती करणे, याची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. मोठ्या प्रमाणावर झालेले शहरीकरण, मायनिंग, जंगलतोड, रस्ते यामुळे वाढलेले तापमान कमी होण्याकरता विद्यार्थ्यांचे प्रयत्न निश्चितपणे फलदायी ठरेल, असे सांगून विद्यार्थ्यांना याचे महत्व समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp