digital products downloads

अर्थ खात्याचा खर्चाची शिस्त लावणारा निर्णय: पहिल्या 9 महिन्यांत 60 टक्के निधी खर्च करा; अजित पवारांच्या खात्याची सर्व विभागांना सूचना – Mumbai News

अर्थ खात्याचा खर्चाची शिस्त लावणारा निर्णय:  पहिल्या 9 महिन्यांत 60 टक्के निधी खर्च करा; अजित पवारांच्या खात्याची सर्व विभागांना सूचना – Mumbai News


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील अर्थ खात्याने एका परिपत्रकाद्वारे सर्वच विभागांना आर्थिक वर्षातील पहिल्या 9 महिन्यांत म्हणजे डिसेंबर 2025 अखेरपर्यंत अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या निधीपैकी 60 टक्के निधी खर्च करण्याचे निर्देश दिलेत. अर

.

वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार, खात्याने 2025-26 च्या अर्थसंकल्पीय वार्षिक तरतुदींपैकी पहिल्या 9 महिन्यांत 60 टक्के निधी करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आता डिसेंबर 2025 अखेरपर्यंत सर्वच विभागांना अनिवार्यपणे व कार्यक्रमांतर्गत खर्चाच्या एकूण वार्षिक तरतुदीच्या 60 टक्के निधी खर्च करावा लागणार आहे. याशिवाय आमदार स्थानिक विकास कार्यक्रम निधी, जिल्हा वार्षिक योजना याचा खर्चही डिसेंबर 2025 अखेरपर्यंत 60 टक्के करण्याच्या सूचना विभागाने केल्या आहेत.

वित्त विभागाच्या या सूचनेमुळे तरतूद करण्यात आलेला निधी नियोजनबद्ध पद्धतीने खर्च होऊन आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये निधी खर्च करण्यासाठी सर्वच विभागांकडून होणाऱ्या धावपळीला चाप बसेल. यामु्ळे वित्त विभागावर वर्षाकाठी येणारा ताणही कमी होईल.

वित्त विभागाने का घेतला हा निर्णय?

यासंबंधीच्या माहितीनुसार, वेतनविषयक खर्च वगळता उर्वरित बाबींचा खर्च आर्थिक वर्षाच्या कालावधीत समप्रमाणात केला जात नाही. निधी उपलब्ध असूनही प्रक्रियेअभावी तो खर्च करता येत नाही. परिणामी, बहुतांश तरतुदी वर्षभर अखर्चित राहतात. त्यानंतर आर्थिक वर्षाच्या अखेरच्या कालावधीत पुरेशा तयारीशिवाय खर्च केला जातो. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर अर्थसंकल्पीय तरतूद आर्थिक वर्षाच्या शेवटी खर्च होते. त्यात वित्तीय शिस्तीचे पालन केले जात नाही. विशेषतः विकासकामांची प्रगतीही राखली जात नाही. त्यामुळे वित्त विभागाने आर्थिक खर्चाची शिस्त लावण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा…

भाजपच्या विचारांचे सर्वच लोक राहू-केतू:संजय राऊत यांची टीका; एकनाथ शिंदेंच्या खात्यातील भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी

मुंबई – जिथे भाजपच्या विचारांचे लोक ते सर्वच राहू – केतू असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्यावर देखील त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. शिंदेंनी लूट केली म्हणून अधिकाऱ्यांनीही लूट केली, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता नगर विकास खात्यातील लुटीची चौकशी करण्याची मागणी देखील संजय राऊत यांनी केली आहे. वाचा सविस्तर

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp