digital products downloads

अवकाळी पावसाचा तडाखा: जालना, नाशिक, जळगावसह राज्यात 22,879 हेक्टर क्षेत्राचे मोठे नुकसान, जालना जिल्ह्यात 1,695 हेक्टरला बसला फटका – Mumbai News

अवकाळी पावसाचा तडाखा:  जालना, नाशिक, जळगावसह राज्यात 22,879 हेक्टर क्षेत्राचे मोठे नुकसान, जालना जिल्ह्यात 1,695 हेक्टरला बसला फटका – Mumbai News


राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाने, वादळी वाऱ्यांनी आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून १५ दिवसांत राज्यातील सुमारे २२,८७९ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केला. जालना, ना

.

राज्यातील २१ जिल्ह्यांतील ८६ तालुक्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांमुळे फळपिकांची झाडे उन्मळून पडल्याची नोंद आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १०,६३६ हेक्टर क्षेत्रावर परिणाम झाला असून मूग, संत्रा, कांदा, ज्वारी, केळी या पिकांच्या मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. त्याखालोखाल जळगाव जिल्ह्यात ४,३९६ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन मका, ज्वारी, बाजरी, भाजीपाला, कांदा, केळी यासह अनेक पिकांना फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यात १,७३४ हेक्टर क्षेत्रावर जालना जिल्ह्यात १,६९५ हेक्टर, तर चंद्रपूर मध्ये १०३८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून मका, धान, फळपिके यांचे नुकसान झाले आहे.

बाधित जिल्हे :

पालघर, रायगड, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे, जळगाव, जालना, परभणी, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली.

पुणे, ठाण्यात कमी फटका

पालघर ७९६ हेक्टर, धुळे ६४५ हेक्टर, गडचिरोली ३४२ हेक्टर, वाशिम २०३ हेक्टर, बुलडाणा १८१ हेक्टर, यवतमाळ १७८ हेक्टर, गोंदिया १४३ हेक्टर, भंडारा ७५ हेक्टर, नागपूर ४२, परभणी ४१ हेक्टर, नंदुरबार २८ हेक्टर, तर सर्वात कमी ठाणे १ हेक्टर, पुणे ५ हेक्टर, रायगड १७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

हे तालुके सर्वाधिक बाधित

अमरावती : अचलपूर, भातुकली, चांदूरबाजार, चिखलदरा. जळगाव : चाळीसगाव, जामनेर, रावेर, भडगाव, एरंडोल, मुक्ताईनगर, धरणगाव, बोदवड, पारोळा. नाशिक : सिन्नर, निफाड, बागलाण, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, मालेगाव, दिंडोरी. जालना : अंबड, मंठा, बदनापूर, परतूर, जालना चंद्रपूर : सावली, पोभुर्ण, राजुरा, मूल, बल्लारपूर, कोरपना, नागभीड, ब्रह्मपुरी.

या पिकांवर प्रभाव

प्रमुख हंगामी फळपिके : आंबा, केळी, संत्रा, पपई तसेच भात, मका, बाजरी, कांदा, भाजीपाला यांना मोठा फटका बसला आहे. काही जिल्ह्यांत मूग, उडीद, भुईमूग यांसारख्या कडधान्य पिकांनाही हानी झाली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp