
Virar Crime News: काही दिवसांपूर्वी विरार येथील दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर सोमवारी आणखी एका विद्यार्थिनीनी इमारतीवरुन उडी घेत जीवन संपवल्याचे समोर आले आहे. विवा कॉलेजची विद्यार्थिनी ऋचा पाटील हिने राहत्या घराच्या गॅलरीतून उडी घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋचा हि बीकॉमच्या शेवटच्या वर्गात शिकत होती. तर, विरारच्या नाना नानी पार्क येथे राहत होती.कॉलेजमधीलच एका मुलासोबत तिचे प्रेमसंबंध होते. मात्र त्या मुलानेच तिचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा हा सगळा प्रकार असह्य झाला तेव्हा तिने वडिलांना मुलाबद्दल सांगितले. वडिलांनी कॉलेजमध्ये जावून संबंधित तरुणाला जाब विचारला.तेव्हा संतापलेल्या मुलाने काही मुलांना आणून ऋचाच्या वडिलांना मारहाण केली.
संबंधित मुलाविरोधात ऋचाने कॉलेडच्या प्राचार्यांकडेदेखील तक्रार केली होती. मात्र त्यांनी मुलांवर कोणतीही कारवाई न करता फक्त समज देऊन त्यांना सोडलं होतं. तेव्हा पुन्हा एकदा मुलाने कॉलेजच्या बाहेर येऊन तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. प्रियकरानेच अश्लील फोटोंच्या आधारे केलेले ब्लॅकमेल अन् वडिलांना झालेली मारहाण या सगळ्या प्रकारामुळं ती खचली होती.
13 ऑक्टोबर रोजी वडिल घरातील दुसऱ्या कामात व्यस्त असताना तिने घराच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली. ऋचाला तात्काळ बंगलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, ऋचाच्या मृत्यूनंतर स्थानिक आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे. तसंच, ऋचाच्या पालकांनीदेखील लवकरात लवकर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या
विरार पश्चिम भागातील आगाशी अर्नाळा रस्त्यावरील ओलांडा परिसरात, ७ ऑक्टोबर २०२५ रोजी (सोमवारी) रात्री साडेनऊ ते दहा वाजताच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. नालासोपारा परिसरातील दोन महाविद्यालयीन विद्यार्थी, आदित्य सिंग (वय २१) आणि श्याम गोरे (वय २०), यांनी एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या १२व्या (काही अहवालांनुसार १८व्या) मजल्यावरून उडी मारून सामूहिक आत्महत्या केली.या दोघे मित्र होते आणि त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
FAQ
प्रश्न १: विरार येथे काय घटना घडली?
उत्तर: काही दिवसांपूर्वी विरार येथे दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांनंतर, १३ ऑक्टोबर २०२५ रोजी विवा कॉलेजची बीकॉम अंतिम वर्षाची विद्यार्थिनी ऋचा पाटील हिने राहत्या घराच्या गॅलरीतून उडी घेऊन आत्महत्या केली. तिचा मृत्यू बंगल्य येथील रुग्णालयात उपचारादरम्यान झाला.
प्रश्न २: ऋचा पाटील कोण होत्या आणि त्या कुठे राहत होत्या?
उत्तर: ऋचा पाटील ही विवा कॉलेजची बीकॉम अंतिम वर्षाची विद्यार्थिनी होती. ती विरारच्या नाना नानी पार्क येथे वडिलांसोबत राहत होती.
प्रश्न ३: आत्महत्येचे कारण काय होते?
उत्तर: ऋचा कॉलेजमधील एका मुलाशी प्रेमसंबंधात होती. त्या मुलाने तिचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा हा प्रकार असह्य झाला, तिने वडिलांना सांगितले. वडिलांनी कॉलेजमध्ये जाऊन मुलाला जाब विचारला, तेव्हा संतापलेल्या मुलाने मित्रांना आणून ऋचाच्या वडिलांना मारहाण केली. यानंतर मुलाने पुन्हा फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली, ज्यामुळे ऋचा खचली आणि तिने आत्महत्या केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.