digital products downloads

आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण: आणीबाणीतील धर्मनिरपेक्ष शब्द हटवा- शिवराज, केंद्रीय कृषिमंत्र्यांचे वाराणसी येथील कार्यक्रमात वक्तव्य

आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण:  आणीबाणीतील धर्मनिरपेक्ष शब्द हटवा- शिवराज, केंद्रीय कृषिमंत्र्यांचे वाराणसी येथील कार्यक्रमात वक्तव्य

  • Marathi News
  • National
  • Remove Secular Words From Emergency Shivraj, Union Agriculture Minister’s Statement At A Program In Varanasi

वाराणसी25 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह यांनी आणीबाणीच्या काळात संविधानात झालेले बदल संपुष्टात आणण्याचे वक्तव्य केले आहे. शिवराज यांनी वाराणसीत एका कार्यक्रमात म्हटले की, ‘समाजवादी’ व ‘धर्मनिरपेक्ष’ या दोन शब्दांना संविधानातून हटवण्याबाबत विचार करायला हवा. एक दिवसापूर्वी संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी म्हटले होते की, संविधानातून हे दोन्ही शब्द हटवायला हवेत. डॉ. आंबेडकर यांनी जे संविधान बनवले त्याच्या प्रस्तावनेत हे शब्द नव्हते. याच संदर्भात शिवराज यांना प्रश्न विचारला. ते म्हणाले, ‘मी बाबा विश्वनाथ यांच्या जमिनीवर बसलो आहे. धर्मनिरपेक्षता आपल्या संस्कृतीचे मूळ नाही. आणीबाणीत हा शब्द जोडला गेला.

‘ऑर्गनायझर’मध्ये लेख; आणीबाणीत काँग्रेसने संविधानाशी छेडछाड केली

संघाशी निगडित साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’मध्ये शुक्रवारी लेख प्रकाशित झाला. त्यात म्हटले आहे की, ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द १९७६ मध्ये काँग्रेसने सरकारने लादलेल्या आणीबाणीच्या काळात जोडण्यात आले, जे संविधान सभेच्या मूळ विचारांविरुद्ध होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेने हे शब्द संविधानात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव फेटाळला होता. लेखात आरोप करण्यात आला की, ‘काँग्रेसने आणीबाणीत संविधानाचा आत्मा बदलला.’

यांना संविधानाबद्दलच द्वेष वाटतो : खासदार राहुल गांधी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी म्हटले की, आरएसएसचा खरा चेहरा यानिमित्ताने पुन्हा समोर आला आहे. त्यांना संविधान नव्हे, तर मनुस्मृती हवी आहे. राहुल गांधी यांनी ही टीका संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या विधानानंतर केली. होसबाळे यांनी संविधानाच्या प्रस्तावनेत समाविष्ट समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या दोन्ही शब्दांच्या समीक्षेबाबत वक्तव्य केले होते. राहुल यांनी म्हटले की, संविधान समानता, धर्मनिरपेक्षता आणि न्यायाबद्दल बोलत असल्याने ते त्याचा द्वेष करतात. त्यांनी आरोप केला की, संघ आणि भाजपचा खरा हेतू संविधानासारखी शक्तिशाली शस्त्रे दलित, मागासवर्गीय आणि गरिबांकडून हिसकावून घेणे हा आहे. कारण त्यांना त्यामु‌ळे पुन्हा गुलाम करता येईल.’

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp