digital products downloads

‘आता तरी उठा, मत चोरी झालीय’, पुण्यात बॅनर झळकल्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया,’एवढे वर्षे लढून..’

‘आता तरी उठा, मत चोरी झालीय’, पुण्यात बॅनर झळकल्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया,’एवढे वर्षे लढून..’

Anna Hazares first reaction: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना उद्देशून पुण्यातील पाषाण परिसरात बॅनर लागले आहेत.  ‘आता तरी उठा, मत चोरी झालेली आहे’ असं त्यावर लिहिलं आहे. लोकपाल बिलासंदर्भात अण्णांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना देशभरातून साथ मिळाली होती. यानंतर अण्णा फारसे दिसले नाहीत. आता वोट चोरी झाल्याचा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलाय. या पार्श्वभूमीवर देशावर संकट आले असून अण्णांची गरज असल्याचे बॅनर पुण्यात लागले आहेत. या बॅनरची खूप चर्चा झाल्यानंतर अण्णा हजारेंनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अण्णा हजारे नाराज 

फोटो असलेले फ्लेक्सबोर्ड लागल्यानंतर अण्णा हजारेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या फ्लेक्सबोर्डद्वारे त्यांना टोमणे मारण्यात आल्याचा उल्लेख आहे. अण्णा हजारे यांनी यावर प्रतिक्रिया देताना तरुणांना देशाप्रती कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. 

काय म्हणाले अण्णा हजारे?

अण्णा हजारे यांनी म्हटले आहे की, ‘मी दहा कायदे आणले, पण 90 वर्षांनंतरही मीच सर्वकाही करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं, ही अपेक्षा चुकीची आहे. मी जे केलं, ते तरुणांनी पुढे करावं, अशी माझी इच्छा आहे’, असे अण्णा हजारे म्हणाले. अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारविरोधी चळवळी, माहितीचा अधिकार, जनलोकपाल विधेयक आणि राळेगण सिद्धी गावाच्या विकासाद्वारे देशभरात सामाजिक बदल घडवले. त्यांनी तरुणांना उद्देशून सांगितले की, फक्त स्वातंत्र्यदिनी तिरंगा हातात घेऊन उत्सव साजरा करणे पुरेसे नाही. “देशाचे नागरिक म्हणून आपले काही कर्तव्य आहे की नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. बोट दाखवून काहीही साध्य होणार नाही,” असेही ते म्हणाले.

तर देशाचे भविष्य उज्ज्वल

अण्णा हाजरेंनी तरुणांवर मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आणि म्हटले, “युवा शक्ती ही राष्ट्र शक्ती आहे. ती जागृत झाली तर देशाचे भविष्य उज्ज्वल आहे.”अण्णा हजारे यांनी गेल्या अनेक दशकांपासून भ्रष्टाचाराविरोधात आणि सामाजिक सुधारणांसाठी लढा दिला आहे. मात्र, आता वयामुळे आणि सामाजिक उदासीनतेमुळे त्यांना खंत वाटत असल्याचे ते म्हणाले. 

 सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवर लढण्याचे आवाहन

“एवढ्या वर्षांच्या लढ्यानंतरही समाज जागृत झाला नाही, हे वाईट वाटते,” असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी तरुणांना प्रेरणा देताना गांधीवादी विचारांचा अवलंब करून सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवर लढण्याचे आवाहन केले. अण्णा यांच्या या संदेशाने पुन्हा एकदा तरुणांना कृतीशील होण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp