
Jitendra Awhad on Harshal Patil suicide Case : सांगलीतील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी गावातील 35 वर्षीय कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. सरकारने जलजीवन मिशन योजनांच्या कामांचे पैसे न दिल्याने नैराश्यातून हर्षद पाटीलने टोकाचे पाऊल उचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सरकारकडे हर्षल पाटील यांचे 1 कोटी 40 लाखांची बिले थकीत होती. सावकार आणि इतर लोकांकडून त्यांनी कामासाठी 65 लाखांचं कर्ज घेतलं होतं. त्यामुळे ही लोकं पैशांसाठी पाटील यांच्याकडे सतत तगादा लावून त्यांचा मानसिक छळ करत होती. एकीकडे सरकारकडून पैसे मिळत नव्हते आणि दुसरीकडे सावकाराचा तगादा त्यामुळे हर्षल यांनी आपल्या जीव दिला. या घटनेनंतर सरकारवर टीकेची झोड उठली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या पोस्टनंतर एका अजून कंत्राटदाराने धक्कादायक विधानानंतर आव्हाड यांची झोप उडाली आहे.
हर्षद पाटील आत्महत्येवर जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट!
पोस्टमध्ये आव्हाड म्हणाले की, सरकारच्या लोकप्रिय योजनांमागचं असंवेदनशील वास्तव! हर्षल पाटील वाळवा तालुक्यातील एका मेहनती तरुणाची आत्महत्या! हर्षल पाटील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या तांदुळवाडी गावचा एक कष्टाळू, तरुण कंत्राटदार.त्याने सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम पूर्ण केलं.पण… काम झालं, बिलं दिली, पण बिचाऱ्याला पैसे मिळालेच नाहीत! त्याचे सरकारकडे 1.40 कोटी इतकी थकबाकी होती. पैसे मिळत नाहीत म्हणून त्याने 65 लाखांचं कर्ज काढलं… आणि शेवटी आर्थिक तणावात येऊन फास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं! पाठीमागे पत्नी, लहान मुलगी, वृद्ध आईवडील, आणि दोन लहान भाऊ…यांना ठेवून.
“लाडकी बहीण योजना” – एक लोकप्रिय योजना असली तरी ती आर्थिकदृष्ट्या राज्याला पेलवणारी योजना नाहीये.एकीकडे या योजनेसाठी सरकारनं कोट्यवधी रुपयांचा निधी बाजूला काढला.राज्यावर कर्जाचा बोजा वाढवला.दुसरीकडे मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा खात्यांची हजारो कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांचं बिल अडवली गेली आहेत.कारण राज्य सरकारकडे ही बिलं देण्यासाठी पैसेच नाहीयेत. मी मागे म्हणालो होतो, “काही महिने जाऊ द्या..कितीतरी कंत्राटदार आत्महत्या करतील…!” दुर्दैवाने त्याची सुरुवात झाली आहे.आज हर्षल पाटील गेलाय,पण उद्या अजून किती जण या दुर्दैवी फेऱ्यात अडकतील,याची कल्पनाच न केलेली बरी, असेही आव्हाड म्हणाले.
हे केवळ आर्थिक संकट नाही – तर प्रशासकीय अपयश देखील आहे! निवडणुका जिंकण्यासाठी लोकांना मोफत सुविधा द्यायच्या, पण त्या माग आवश्यक असणारा आर्थिक ताळेबंद साधायचा नाही. हर्षल पाटील यांची आत्महत्या ही केवळ एक वैयक्तिक दु:खद घटना नाही – ती एक इशारा आहे. राज्य शासन, प्रशासन आणि समाजाने ही गोष्ट गांभीर्याने घेणं गरजेचं आहे, असेही आव्हाड यांनी म्हटलं.
सरकारच्या लोकप्रिय योजनांमागचं असंवेदनशील वास्तव!
हर्षल पाटील – वाळवा तालुक्यातील एका मेहनती तरुणाची आत्महत्या!हर्षल पाटील – सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या तांदुळवाडी गावचा एक कष्टाळू, तरुण कंत्राटदार.त्याने सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम… pic.twitter.com/pCYOzT1qcg
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 23, 2025
‘आता पुढचा नंबर माझा…’
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टवर एका तरुण कंत्राटदाराने धक्कादायक विधान केलं आहे. त्याने आव्हाड यांना मेसेज केला की, ‘आपली ही पोस्ट बघितली आणि पुढचा नंबर माझाला असेल का असे वाटत आहे. मी सुद्धा सरकारी कामं केली आहेत. माझी देखील अनेक बिलं थकीत आहेत, असा मेसेज तरुणाने केला.
हा मेसेज वाचून पाया खालची जमीन सरकली.@CMOMaharashtra हात जोडून विनंती वैयक्तिक लक्ष घाला pic.twitter.com/ykMa1tTTVV
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 23, 2025
याचा स्क्रीनशॉट आव्हाड यांनी शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.