
- Marathi News
- National
- Operation Sindoor Is Not An Ordinary Operation, It Is A Trinity Of India’s Policy, Destiny And Decisive Ability: Modi
श्रीनगर/शोपियां2 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात मंगळवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांतील चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख नेता शाहिद कुट्टेसह तीन दहशतवादी ठार झाले. ही चकमक दक्षिण काश्मीरमधील शुकुरू केलर भागात झाली. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराव आणि शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला; प्रत्युत्तरात, तिन्ही दहशतवादी मारले गेले. मारल्या गेलेल्या दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख अदनान शफी म्हणून झाली आहे. तिसऱ्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कुट्टे हा शोपियांमधील छोटीपोरा हिरपोरा येथील होता. तो मार्च २०२३ मध्ये तोयबामध्ये सामील झाला. दोन वर्षे सक्रिय असलेल्या शाहिदचे नाव सुरक्षा दलांच्या ‘अ’ श्रेणीतील दहशतवादी यादीत होते. मे २०२४ मध्ये हिरपोरा येथे झालेल्या भाजप सरपंचाच्या हत्येमागील तो सूत्रधार होता. याशिवाय तो अनेक दहशतवादी घटनांमध्येही सहभागी होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काही दिवसांनी प्रशासनाने त्याचे घर पाडले. अदनान शफी शोपियांच्या वंडुना मेलहोरा भागातील होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तोयबात सामील झालेला शफी ‘क’ श्रेणीचा दहशतवादी होता.गतवर्षी स्थलांतरित मजुराच्या हत्येत त्याचा सहभाग होता.
विरोधक: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या दाव्याने घाबरून ‘तिरंगा यात्रा’ काढली
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीसंबंधी दाव्यावर भाजपच्या प्रतिक्रियेवर टीका केली. गेहलोत म्हणाले की, ट्रम्प यांच्या दाव्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने उत्तर द्यायला हवे. त्यांनी मोदींच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाला निराशाजनक म्हटले आहे. गेहलोत यांनी आरोप केला की, भाजपने जनतेच्या प्रतिक्रियेला घाबरून ‘तिरंगा यात्रा’ काढण्याचा निर्णय घेतला. गेहलोत यांनी सर्वपक्षीय बैठक व विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.
शोपियां चकमकीत तोयबाचा म्होरक्या शाहिद कुट्टेसह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
पाकिस्तानविरुद्धच्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशामध्ये जालंधरच्या आदमपूर एअरबेसने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मंगळवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आदमपूर हवाई तळावर पोहोचले. त्यांचे भारत माता की जयच्या घोषणांनी स्वागत झाले.ते गाडीतून उतरताच भारत माता की जयची घोषणा दिली. सैनिकांनीही उत्साहात त्यास प्रतिसाद दिला.
पंतप्रधान म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरचा प्रत्येक क्षण भारतीय सैन्याच्या सामर्थ्याची साक्ष देतो. ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर हे कोणतेही सामान्य अभियान नाही, तर ते भारताची नीती, नियत आणि निर्णायक क्षमतेचा त्रिवेणी संगम आहे. मोदी म्हणाले की, पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ठिकाणे व एअरबेस उद्ध्वस्त झालेच, पण त्यांचे नापाक इरादे आणि दुस्साहस या दोघांचाही पराभव झाला आहे. मोदी सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत आदमपूर एअरबेसवर होते. पंतप्रधानांनी जवानांसोबतचा संवाद सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला.
पहलगाम हल्ला करणाऱ्या टीआरएफवर निर्बंधासाठी भारत यूएनमध्ये जाणार: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत ॲक्शन मोडमध्ये आहे. आता लक्ष्य आहे दहशतवादी संघटना टीआरएफ (द रेझिस्टन्स फ्रंट), ज्याला संयुक्त राष्ट्रामध्ये दहशतवादी संघटना घोषित करण्यासाठी भारत पूर्ण ताकद लावत आहे. पाकिस्तान या संघटनेला आश्रय देण्याचा व वाचवण्याचा निष्फळ प्रयत्न करत आहे, तो भारताच्या पुराव्यांसमोर उघडा होणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.