digital products downloads

आदित्य ठाकरेंकडून अदिती तटकरेंचं समर्थन, थोरवेंच्या आरोपांनी नव्या वादाला फोडणी!

आदित्य ठाकरेंकडून अदिती तटकरेंचं समर्थन, थोरवेंच्या आरोपांनी नव्या वादाला फोडणी!

Aditya Thackeray: रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. आदित्य ठाकरेंनी या वादात उडी घेऊन भरत गोगावले यांना डिवचलंय. त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरे आणि ठाकरे यांचे व्यावसायिक संबंध असल्याचा नवा आरोप केलाय. रायगडच्या पालकमंत्रीपदाचं अद्यापही भिजत घोंगडं आहे.त्यातच आता 15 ऑगस्टला आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे.पालकमंत्रीपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिवसेनेच्या पदरी मात्र पुन्हा एकदा निराशा आलीय.त्यामुळे रायगडात पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटलाय. 

‘आधी रुसायचं मग रडायचं’

या वादात आता आदित्य ठाकरेंनी उडी घेतलीय.आधी मंत्रीपदावरून रूसायचं आणि आता पालकमंत्रीपदासाठी रडायचं हे योग्य नाही, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी गोगावलेंना टोला लगावला. इतकंच नाही तर रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरेंनाच मिळावं म्हणत ठाकरेंनी गोगावलेंना डिवचलं.

‘तटकरे आणि ठाकरे यांचे घनिष्ठ व्यावसायिक संबंध’

आदित्य ठाकरेंनी पालकमंत्रीपदासाठी आदिती तटकरेंचं समर्थन करणं शिवसेनेच्या चांगलंच जिव्हारी लागलंय.त्यामुळे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी आरोपांचा नवा बॉम्ब टाकलाय. तटकरे आणि ठाकरे यांचे घनिष्ठ व्यावसायिक संबंध आहेत. त्यांच्या अनेक एकत्रित कंपन्या असल्याचा आरोप महेंद्र थोरवे यांनी केलाय.

शिवसेनेची सौम्य नाराजी स्फोटक होणार?

रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सुरू झालेला वाद आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपापर्यंत येऊन पोहोचलाय.रायगडप्रमाणेच नाशकातही सत्ताधारी शिवसेनेला झेंडावंदनाचा मान देण्यात आलेला नाहीय.रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे तर नाशकात भाजपचे गिरीश महाजन ध्वजारोहण करणार आहेत.त्यामुळे रायगडपाठोपाठ नाशिकमध्येही शिवसेनेच्या पदरी निराशाच आलीय. त्यामुळे याच पद्धतीचा न्याय पालकमंत्रीपदासाठी लावला तर शिवसेनेची ही सौम्य नाराजी स्फोटक होऊ शकते, इतकं निश्चित आहे.

FAQ: 

प्रश्न: रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद का निर्माण झाला आहे?

उत्तर: रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. महायुती सरकार स्थापनेनंतरही पालकमंत्रीपदाचा निर्णय रखडला आहे. 15 ऑगस्ट 2025 रोजी आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याने गोगावले आणि शिवसेना समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. यात आदित्य ठाकरे यांनी आदिती तटकरे यांचे समर्थन करत गोगावलेंना टोला लगावला, ज्यामुळे वाद अधिक चिघळला आहे.

प्रश्न: आदित्य ठाकरे आणि महेंद्र थोरवे यांनी कोणते आरोप केले आहेत?

उत्तर: आदित्य ठाकरे यांनी भरत गोगावलेंना टोमणा मारताना म्हटले की, “मंत्रीपदावरून रूसायचे आणि आता पालकमंत्रीपदासाठी रडायचे हे योग्य नाही,” तसेच आदिती तटकरे यांनाच पालकमंत्रीपद मिळावे असे समर्थन केले. याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आदित्य ठाकरे आणि तटकरे यांच्यात घनिष्ठ व्यावसायिक संबंध असून, त्यांच्या एकत्रित कंपन्या असल्याचा गंभीर आरोप केला, ज्याने वाद वैयक्तिक पातळीवर गेला आहे.

प्रश्न: रायगडच्या पालकमंत्रीपद वादाचा नाशिकवर काय परिणाम झाला आहे?

उत्तर: रायगडप्रमाणेच नाशिकमध्येही शिवसेनेला स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाचा मान मिळाला नाही. रायगडमध्ये आदिती तटकरे (राष्ट्रवादी) आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन (भाजप) ध्वजारोहण करणार आहेत. यामुळे शिवसेनेची नाराजी वाढली आहे. जर पालकमंत्रीपदाच्या वाटपातही असाच निर्णय झाला, तर शिवसेनेची सौम्य नाराजी स्फोटक स्वरूप धारण करू शकते, अशी शक्यता आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp