digital products downloads

आदित्य ठाकरेंना टार्गेट करू नये: पण दिशा सालियान प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भूमिका – Mumbai News

आदित्य ठाकरेंना टार्गेट करू नये:  पण दिशा सालियान प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भूमिका – Mumbai News


दिशा सालियान मृत्यू प्रकरणात वडील सतीश सालियान यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची नव्याने चौकशी करावी आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. यामुळे पाच वर्षांनंतर पुन

.

रामदास आठवले म्हणाले, दिशा सालियान हिचा मृत्यू हा अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणात उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना चर्चा झाली होती. आदित्य ठाकरे यांचा यामध्ये समावेश आहे की नाही याबाबत मला माहिती नाही किंवा आदित्य ठाकरे यांना या प्रकरणात टार्गेट करण्याची कोणतीच भूमिका आमची नाही.

परंतु दिशा सालियान हिच्या आई वडिलांनी केलेल्या तक्रारीवर या प्रकरणातील चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा समावेश असेल असे मला अजिबात वाटत नाही. यासंदर्भातील चौकशी ही निःपक्षपातीपणे होणे गरजेचे आहे. शिवाय आदित्य ठाकरे यांना यामध्ये टार्गेट करू नये, असेही रामदास आठवले म्हणाले.

आदित्य ठाकरेंना क्लीन चीट – संजय गायकवाड

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे देखील आदित्य ठाकरेंची बाजू घेताना दिसले. दिशा सालियान प्रकरणी तिच्या वडिलांनी जी याचिका केली आहे, तो त्यांचा निर्णय आहे. त्या प्रकरणी सीआयडीने सांगितले आहे की यात कुठलाही राजकीय अँगल दिसत नाही. शासनाच्या सर्व यंत्रणा जर राजकीय अँगल दिसत नाही असा रिपोर्ट देतात. त्यामुळे कोणावरही चिखल फेक करणे किंवा कोणाला फसवणे मला तरी योग्य वाटत नाही, असे संजय गायकवाड म्हणाले. ज्या वेळेला पोलिस यंत्रणांनी आदित्य ठाकरेंना सगळ्या प्रकरणातून क्लीन चीट दिली आहे. तर मला वाटते हायकोर्टातील याचिकेतून वेगळे काही बाहेर पडणार नाही. तिच्या कुटुंबीयांना पोलिस यंत्रणेवर विश्वास नसावा म्हणून त्यांनी याचिका केली असेल. सीआयडीने तपास केला त्यावर त्यांना विश्वास नसावा, असे संजय गायकवाड म्हणाले.

माझ्या बदनामीचा प्रयत्न केला जातोय – आदित्य ठाकरे

दरम्यान, या प्रकरणावर आता आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना एका वाक्यात उत्तर दिले आहे. गेल्या पाच वर्षांपासून माझ्या बदनामीचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यामुळे आम्ही न्यायालयात बोलू असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. या प्रकरणाचे राजकारण केले जात आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp