
आप हा दिल्लीच्या विकासामध्ये बाधा ठरणारा पक्ष होता. सर्व मोफत देत राज्य चालवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, तो प्रयत्न निश्चितच विकास आणि प्रगतीमध्ये आडकाठी टाकणार आहे, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
.
सुधीर मुनगंटीवार पुढे बोलताना म्हणाले की, तेलंगणा, आंध्र प्रदेश, आणि आता दिल्लीच्या जनतेने सांगितले की देशाच्या प्रगतीचा संकल्प करत त्यासाठी मेहनत करणारा पक्ष निवडून आला पाहिजे. दिल्लीत आता भाजपचे सरकार आल्यावर वेगाने प्रगती पथावर जाईल.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी दोन वेळा खोटे बोलून सरकार आणले. त्याच्या या खोटेपणाला जनतेने मतदानातून समर्पक उत्तर दिले आहे, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे. दिल्ली जिंकली म्हणजे देशातील प्रत्येक निवडणूक आम्ही जिंकणार आहोत. दिल्ली निवडणुकीच्या निकालाचा बिहार निवडणुकीवर परिणाम होणार आहे. बिहारमध्ये भाजपला चांगले वातावरण निर्माण होणार असून भाजप आणि मित्रपक्ष यांच्या जागा वाढणार आहेत.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राहुल गांधींनी काल जे विधान केले आहे ते पराभवाची पूर्व तयारी आहे. नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारा ते सांगतात की प्रश्न अभ्यासक्रमातील नव्हता. ते असे कधीच म्हणणार नाही की माझा अभ्यास नव्हता.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.