digital products downloads

आमचा युद्धसराव आधीच झालेला आहे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर संजय राऊतांचा निर्धार – Mumbai News

आमचा युद्धसराव आधीच झालेला आहे:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर संजय राऊतांचा निर्धार – Mumbai News


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील 4 महिन्यांच्या आत घेण्याचे महत्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एका प्रकरणात सुनावणी करताना दिले. तसेच याबाबतची अधिसूचना येत्या चार आठवड्यात काढावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आ

.

ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे महाराष्ट्रात 2021 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आता आगामी निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. कोर्टाच्या आदेशांनुसार, ओबीसी समुदायाला 2022 पूर्वी असणारे आरक्षण कायम ठेवून 4 महिन्यांच्या आत ही निवडणूक घ्यावी लागणार आहे.

नेमके काय म्हणाले संजय राऊत?

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, कायद्याच्या कचाट्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अडकवून ठेवण्यात आल्या होत्या. पण आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यामुळे आम्ही आता या निवडणुकांसाठी तयार आहोत. परंतु आम्ही वारंवार मागणी करत होतो की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात निवडणुका घेणे महत्त्वाचे आहे. कारण नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा इथे जर लोकप्रतिनिधींचे सरकार नसेल, तर लोकांनी कामे कोणाकडे घेऊन जायची? विकास कसा होणार? असे प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले.

आमचा युद्धसराव आधीच झालेला आहे

संजय राऊत म्हणाले की, आज मुंबईची आणि ठाण्याची अवस्था पाहा. महापालिका निवडणुका न झाल्यामुळे या शहरांना कशी दुर्गंधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. या निवडणुका चार महिन्यात घ्यायच्या आहेत आणि आमचा युद्धसराव आधीच झालेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यात घेणे सोपे नाही. तरीही आम्हाला सगळ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्यामुळे त्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढेल

दुसरीकडे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो. पण धोरण म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढेल, असेही ते म्हणालेत. चोंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp