digital products downloads

आमदार नव्हे, दोन-चार मंत्र्यांना कापा: रविकांत तुपकरांचे वादग्रस्त विधान, कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनांचा नागपुरात मोर्चा – Maharashtra News

आमदार नव्हे, दोन-चार मंत्र्यांना कापा:  रविकांत तुपकरांचे वादग्रस्त विधान, कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनांचा नागपुरात मोर्चा – Maharashtra News


शेतकऱ्यांनो आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापा, असे विधान काही दिवसांपूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी केले होते. आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी त्यापुढेही जाऊन आमदाराऐवजी दोन-चार मंत्र्यांना कापा, पण मागे हटू नका, असे वादग्

.

शेतकरी कर्जमाफी आणि वाढत्या आर्थिक अडचणींविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज नागपुरात भव्य मोर्चा काढण्यात आला. सरकारने दिलेल्या अल्टिमेटमची मुदत संपताच निघालेल्या या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर संघटनांचे हजारो शेतकरी सहभागी झाले. मोर्चामुळे नागपूर–हैदराबाद महामार्ग काही काळ ठप्प झाला. या आंदोलनानंतर आता बच्चू कडू कोणती नवी भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमकपणे भाषण करत, राज्य सरकार आणि मंत्र्यांवर सडकून टीका केली.

नेमके काय म्हणाले रविकांत तुपकर?

महाराष्ट्रातील आम्ही सर्व शेतकरी नेते एकत्र आहोत. ही एक अभूतपूर्व गोष्ट या ठिकाणी घडताना दिसत आहे. आम्ही वेगवेगळ्या भागात लढतो. पण शेतकऱ्यांची वज्रमूठ एका ठिकाणी आणण्याचे काम बच्चू कडू यांनी केलं आहे. हा मोर्चा अशा ठिकाणी आणला आहे की, समृद्धी महामार्ग बंद, हैदराबाद-जबलपूर मार्ग बंद सगळे रस्ते बंद केले आहेत. बच्चू कडू यांनी फार सर्वेक्षण केलेले आहे. कारण इथून एकही गाडी पास होणार नाही. सरकारचे नाक दाबल्याशिवाय सरकारचे तोंड उघडत नाही, असे रविकांत तुपकर म्हणाले.

सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी

आज सोयाबीन साडेतीन ते चार हजार रुपयांनी विकले जात आहे. सोयाबीनचे एक क्विंटल उत्पादनासाठी साडे सात हजार रुपये खर्च येतो आणि बाजारात तीन ते साडेतीन हजार रुपये भाव मिळत आहे. कापसाची देखील तीच अवस्था आहे. केंद्र सरकारने सोयाबीन निर्यात केली नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सोयाबीनची निर्यात केल्यास त्याला 8000 भाव मिळेल. कापूस आयातीपेक्षा कापूस निर्यात करा. आमच्यामुळे आमच्यावर कर्ज झाले नाही तर तुमच्या धोरणांमुळे आम्ही कर्जबाजारी झालो आहे. तुम्ही कापूस, ऊस शेतकऱ्यांना लुटला आणि आम्ही कर्जबाजारी झालो, असा आरोप रविकांत तुपकर यांनी सरकारवर केला.

सरकारला शेतकऱ्यांच्या दारात यावे लागेल

जातीचा मोर्चा निघाला की सरकार आंदोलनस्थळी चर्चेसाठी येते. मग आज आमच्या मातीचा मोर्चा निघाला तर तुम्ही इथे का येऊ शकत नाहीत? हा आमचा सरकारला सवाल आहे. आम्ही तुमच्या दारात येणार नाहीत. तुम्हाला चर्चा करायला शेतकऱ्यांच्या दारात नागपूरच्या वेशीवर यावे लागेल, असे रविकांत तुपकर म्हणाले.

एक वर्ष उलटूनही कर्जमाफीची घोषणा नाही

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सांगतात की, बैठक बोलावली होती पण चर्चेला आले नाहीत. सरकारने निवडणुकीच्या आधी कर्जमाफीची घोषणा केली होती. आता त्याला एक वर्ष झाले तरी त्यावर काहीच बोलत नाहीत. आम्ही भीक मागायला आलो नाहीत. सोयाबीनला भाव देता येत नाही. सोयाबीन निर्यात होत नाही. परदेशात निर्यात करा. सोयाबीनचे योग्य भाव मिळतील. कापसाची आयात करण्यापेक्षा निर्यात करा. कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे”, असं तुपकर म्हणाले.

तुपकरांकडून मंत्र्यांना शिवीगाळ

नेपाळमध्ये जसे मंत्र्यांना तुडवून तुडवून हाणले, नेपाळचे मंत्री देश सोडून पळून गेले. लक्षात ठेवा. मी तर बच्चू भाऊंना म्हणेन, नागपूरनंतरचा चौथा टप्पा मुंबईचा ठेवा. सा***, हरामखोरांना मुंबई आणि महाराष्ट्रातून जावे लागले पाहिजे. त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. सरकार आपल्याशी नीट वागणार नसेल तर सरकारच्या उरावर बसावे लागेल. माझ्यावर शंभर केसेस आहेत. तुम्ही म्हणाल, खिसे कापतो की काय तर नाही गेल्या 22 वर्षात अनेकांचे माज उतरवण्याचे काम केले आहे, असा घणाघात रविकांत तुपकर यांनी सरकारवर केला.

आमदार नाही, दोन-चार मंत्र्यांना कापा

आम्ही काही फक्त बोलबच्चन नाही. आम्ही जे बोलतो ते करतो. लोक म्हणतात की शेतकऱ्यांचे मजबूत संघटन होऊ शकत नाही. पण तुम्ही दाखवून दिले की, शेतकरीही एकत्र येऊ शकतात. इथून पुढे आत्महत्या करायच्या नाहीत. कितीही संकटे आली तरी जीवन संपवायचे नाही. बच्चू भाऊंनी सांगितले की, आमदाराला कापा. मी त्या पुढे जाऊन सांगतो की दोन-चार मंत्र्यांना कापा. पण आता मागे हटायचे नाही. मरायचं तर आजिबात नाही.

सरकार चर्चेला कसे येत नाही, ते पाहूच

युद्धामध्ये काही झाल्यास नेत्याचा आदेश शिरसावंद्य असतो. त्यामुळे इथले नेते जो काही आदेश देतील, त्याची अंमलबजावणी करा. घरी फोन करून सांगा, कर्जमाफी केल्याशिवाय माघारी येणार नाही. त्यामुळे आता सरकार कसे चर्चेला येत नाही ते आपण पाहूच. शेतकऱ्यांची एकजुट झालेली वज्रमुठ सोडू नका. इंग्रज माजले म्हणून महात्मा गांधी, भगतसिंहांचा जन्म झाला. अण्णा हजारेंनी आंदोलन केल्याने केजरीवाल दोन-तीन वेळा मुख्यमंत्री झाले. आता राज्यातील सरकार माजलं म्हणून इथले नेते जन्माला आले आहेत असे समजा, असे रविकांत तुपकर म्हणालेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp