
आरएसएस ही रजिस्टर्ड संस्था नसताना सुद्धा पैसे गोळा करत आहे. गोळा केलेल्या पैशाचा हिशोब आरएसएसने जनतेला दिलाच पाहिजे. शासनाने यात लक्ष घातले पाहिजे, असे मत कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. आरएसएसला बंदी घालावी, या मागणीला घेऊन वंचित ब
.
नाना पटोले म्हणाले, जेव्हा एखाद वेळी समूह एकत्र येतात. त्यामुळे ते पैसे गोळा होतात. ती संस्था काय करते? त्या संस्थेचा मूळ उद्देश काय आहे? या सगळ्या गोष्टी रजिस्ट्रेशनमध्ये असतात. यांचे कुठलेही रजिस्ट्रेशन झाले नसल्यामुळे हा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहेच. काँग्रेसच्या सत्तेमध्ये सुद्धा त्या प्रकारचा अनेकदा प्रयत्न झाला. पण आता जनतेमध्ये त्या पद्धतीचा एक वातावरण मान होत असेल तर शासनाने त्यात लक्ष घातले पाहिजे.
महाराष्ट्र आता महिलांसाठी असुरक्षित
छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात महिलांचा जो सन्मान होत होता. तो आता महायुतीच्या सरकारमध्ये होत नाही. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहे. केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यांनीच नॅशनल क्राइम ब्युरोच्या सादर केलेल्या रिपोर्टमध्ये महाराष्ट्रात महिलांवर सर्वाधिक अत्याचार होत असल्याचे नमूद आहे. महाराष्ट्र आता महिलांसाठी असुरक्षित राज्य झाल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.
महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण सर्वात जास्त
सातारा येथील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणावर बोलताना नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील महिला अत्याचाराच्या घटना समोर येतात आहेत. कर्मचारी असो की सामान्य महिला त्यांच्यावर सातत्याने अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. नॅशनल क्राइम ब्युरोचा जो आता रिपोर्ट आलेला आहे, त्यात महाराष्ट्र महिलांसाठी आता असुरक्षित आहे. महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण सर्वात जास्त असल्याची टीका पटोले यांनी केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



