
Manoj Jarange : कर्जमाफीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना तंबी दिली आहे. तर जलसंधारणमंत्री गिरीष महाजन यांनी कर्जमाफी दिल्यास तिजोरीत ख़डखडाट होणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास सत्ताधारी नेत्यांना गावबंदी करणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांना सरकारला दिला आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला घेरलं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यास सत्ताधारी नेत्यांना गावबंदी करणार असा इशाराच आता जरांगे पाटलांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन सरकारनं घुमजाव केल्यानं जरांगे पाटील आता आक्रमक झाले आहेत.
…तर अजित पवार यांनी राजीनामा द्यावा
शेतकरी कर्जमाफीवरुन अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी देखील त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. सरकारने वचनभंग केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यास राज्याची तिजोरीचा खळखळाट होणार असल्याचं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे.
कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन
अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रकरणी केलेल्या वक्तव्यानंतर परभणीतील शेतकरी देखील आक्रमक झाले आहेत. सरकारचा निषेध म्हणून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी गुढीपाडव्या निमित्त काळी गुढी उभारत राज्य सरकारचा निषेध केला आहे. दरम्यान, शेतकरी कर्जमाफीचा निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा देखील इशारा देखील परभणीमधील शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे.
शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यास राज्याची तिजोरीचा खळखळाट
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं शेतकरी कर्जमाफी करणार अशी घोषणा केली होती. महायुतीच्या जाहिरनाम्यात देखील कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, आता लाडकी बहिण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीभवर भार पडत असल्याचं सांगण्यात येतं आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी होणार की हे फक्त एक आश्वासनच राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.