
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला पकडून सरकारने उपकार केले का?, पीडितेने स्ट्रगल केले नाही म्हणणारे गृह राज्यमंत्री दिव्य आहेत, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यांना सर्व जण दादा म्हणतात त्यांच्याच राज्यात हे या सगळ्या गोष्टी घडत आहेत?, राजकीय वरदहस्त लाभलेले अनेक गुन्हेगार आहेत.
पुण्यात गुंडांनी भाजप अन् राष्ट्रवादीला मदत केली
संजय राऊत म्हणाले की, पुण्यातील गुंडांची ओळख परेड पोलिस आयुक्तांनी काढली होती. इतका मोठा इव्हेंट केला होता, ते सगळे गुंड भारतीय जनता पक्षाच्या आणि अजित पवारांच्या प्रचारामध्ये सक्रिय होते. तेव्हा त्यांची ओळख परेड आणि धिंड का काढली नाही. ज्या गुंडांची पुण्यामध्ये ओळख परेड पार पडली. याच गुंडांनी निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाला मदत केली असा आरोप राऊत यांनी केला आहे.
म्हणून गुन्हेगारी वाढली
संजय राऊत म्हणाले की, एका अबलेवर गाडीत जबरदस्ती होते तिने स्ट्रगल केले नाही, म्हणून आम्हाला काही कळाले नाही, असे गृह राज्यमंत्री म्हणत आहे. या लोकांची असे कृत्य करण्याची हिंमत होते कशी. कायद्याचा धाक राहिलेला नाही. पोलिसांना आणि कायद्याला आम्ही मॅनेज करू शकतो असा गुंडांमध्ये आत्मविश्वास असल्याने गुन्हेगारी वाढत चाललली आहे.
तोपर्यंत विकृती वाढत जाईल
संजय राऊत म्हणाले की, न्यायालयात आम्ही हवा तो निर्णय घेऊ शकतो हा आत्मविश्वास गुन्हेगारांमध्ये आला आहे. त्यातून राजकीय वरदहस्त मिळालेले गुन्हेगार मोकाट सुटतात. गुन्हेगारांना कोणताही पक्ष नसतो. ते कोणत्याही नेत्यासोबत फोटो काढतात आणि रुबाब गाजवतात. यांना कठोर शासन होत नाही तोपर्यंत विकृती वाढत जाईल.
‘हे’ राज्यकर्त्यांनी पाहिले पाहिजे
संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीमहाराज यांच्या विचारांच्या संदर्भात आपण सध्या काम करत आहोत. त्यांच्या राज्यात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कशाप्रकारे कठोर शासन केले जात होते, कशी दहशत होती हा इतिहास राज्यकर्त्यांनी पाहिला पाहिजे.
निवडणुकीसाठी एन्काउंटर
संजय राऊत म्हणाले की, अक्षय शिंदे यांचा जेव्हा एन्काउंटर झाला तेव्हा निवडणुका होत्या. विधानसभा निवडणूक असल्याने त्यांचा एन्काउंटर करण्यात आला. आता काही निवडणुका नाहीत. तो ठाणे जिल्हा होता हा पुणे जिल्हा आहे. जिल्ह्या-जिल्ह्यात कायदा बदलत असतो. पोलिस आयुक्तांनी गुंडाची ओळख परेड केली ते सर्व जण राष्ट्रवादी-भाजपच्या प्रचारात सक्रीय होते तेव्हा पोलिसांनी त्यांची धिंड काढली नाही.
ते कोणतीही पदवी विकत घेऊ शकतात
संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी जसे आमदार-खासदार विकत घेतले तसे ते लेखक, कवी सारख्या हव्या त्या पदव्या विकत घेऊ शकतात. त्याबद्दल नोबल पुरस्कार सुद्धा मिळू शकतो. एकनाथ शिंदे आणि कंपनी वगैरे जे बोलत आहेत त्यांचा आणि मराठी साहित्य, भाषा, स्वाभिमान इतिहास याच्याशी काहीही संबंध नाही. त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात पैसा आहे. अशा प्रकारचा पैसे अफजल खान, निजाम आणि औरंगजेबाकडेही होता. तेवढा तमुच्याकडे आहे.शिवाजी महाराज यांच्याकडे तो पैसा नसल्याने त्यांना सुरतवर हल्ला करावा लागला. कारण सुरतमधून देशाविरोधात मुघलांसह इंग्रजांना पैसा दिला जात होता. याच सुरतमध्ये जाऊन हे लोकं थांबले होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.