
Mumbai Azad Maidan History: मनोज जरांगे मुंबईत दाखल झाले आहेत. आझाद मैदानात लाखो मराठा बांधव जमा झालेत. याच मैदानावरुन जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाची हाक दिली आहे. दक्षिण मुंबईत असलेले आझाद मैदान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या मैदानात खेळ कमी अन् आंदोलन जास्त होतात, अशी मैदानाची ओळख आहे. पण तुम्हाला माहितीये का आझाद मैदानाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं आहे. या आझाद मैदानाचा इतिहास जाणून घेऊयात.
आझाद मैदान ब्रिटिशांच्या काळात बॉम्बे जिमखाना मैदान म्हणून ओळखलं जायचं. या मैदानात ब्रिटिश अधिकारी क्रिकेट, हॉकी आणि इतर खेळ खेळायचे. या मैदानावर क्रिकेटचे 22 पिच असून एकूण 25 एकरावर पसरले आहे. आझाद मैदानाने मुंबई बदलताना पाहिली आहे. आजही तुम्हाला ब्रिटिश राजवटीतील काही खाणाखुणा या मैदानाजवळपास दिसतील. इतकंच नव्हे तर स्वातंत्र्यसंग्रामदेखील आझाद मैदानने पाहिला आहे. आझाद मैदान हे स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतीक बनले म्हणून या मैदानाला आझाद मैदान असंही नाव पडलं.
महात्मा गांधी यांच्या अनेक महत्त्वपूर्ण सभा येथेच झाल्या आहेत. 1942च्या क्रांतीच्या स्मृतीचे प्रतीक हे मैदान आहे. 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी गवालिया टँक मैदानातून भात छोडो आंदोलनाची घोषणा केली. यावेळी त्यांनी करो या मरोचा नारा दिला.
आझाद मैदानासमोरच बॉम्बे जिमखाना आहे. डिसेंबर 1933मध्ये भारताच्या पहिल्या टेस्ट मॅचचे आयोजन करण्याचा मान मिळाला होता. तेव्हा टीमचे कर्णथार सीके नायडू होते. इतकंच नव्हे तर आझाद मैदानात 1987 साली हॅरिस शील्ड स्कूल मॅचदेखील झाली होती. ज्यावेळी सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळी यांनी 664 धावांची पार्टनरशिप करत रेकॉर्ड केला होता.
आझाद मैदानातील शपथविधी
आझाद मैदानात पहिल्यांदा शपथविधी झाला तो म्हणजे नोव्हेंबर 2024 साली. काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आझाद मैदानातच दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तर, 2024मध्ये महायुती सरकारचा शपथविधी पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.
FAQ
आझाद मैदान कुठे आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे?
आझाद मैदान दक्षिण मुंबईत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) जवळ आहे. हे मैदान ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे, कारण येथे स्वातंत्र्यसंग्रामाच्या सभा, आंदोलने आणि महत्त्वपूर्ण क्रीडा सामने झाले आहेत.
आझाद मैदानाला का आंदोलनांचे केंद्र मानले जाते?
आझाद मैदानात अनेक ऐतिहासिक आंदोलने आणि सभा झाल्या आहेत. सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे हे मैदान पुन्हा चर्चेत आहे. याशिवाय, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक आंदोलने येथे नियमितपणे होतात, ज्यामुळे याला “आंदोलनांचे केंद्र” असे संबोधले जाते.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे आझाद मैदानाशी काय नाते आहे?
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात उपोषणाची घोषणा केली आहे. लाखो मराठा बांधव येथे जमले आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.