
लक्ष्मीपूजनासाठी मूर्तीवरुन शेवटचा हात फिरवताना कलाकार
.
दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. प्रकाशाचा सण उजळवताना पारंपरिक कुंभाराकडील मातीच्या पणत्यांचा वापर करून स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन कुंभार समाज जिल्हा संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दिवाळी म्हटले की, समोर उभे राहते लक्ष्मीपूजन व पूजेसाठी लागणारे साहित्य. जसे की, पणती ,बोळकी इत्यादी. मात्र हे बनवणाऱ्या कुंभाराला दसक, पंचक,माती तसेच इतर साहित्य बाहेर गावावरून आणावे लागते. त्यात घोड्याची लीद, राख आदी मिश्रण करून त्याचा चिखलाचा गोळा करावा लागतो. यंदा बोळकी मोठय़ा प्रमाणात बाजारात येण्याची शक्यता आहे. सध्या 2500 रुपयांत हजार, असा मातीच्या बोळक्यांचा दर आहे. तो किरकोळ बाजारात थोडासा वाढू शकतो. या भावात परिश्रम, कष्ट आणि संपूर्ण कुटुंबाचा हातभार लागत असल्याने उत्पादन खर्च सुटत नाही. कारण तयार केलेला सर्वच माल विकला जाईल की नाही, याची शास्वती नाही. त्यामुळे उरलेला माल अंगावर पडतो. कुंभार समाजातील कारागिरांनी मेहनतीने तयार केलेल्या विविध आकारांच्या आणि आकर्षक रंगसंगतीच्या मातीच्या पणत्या, दिवे, कंदील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. मात्र, प्लास्टिक व इलेक्ट्रॉनिक दिव्यांच्या वाढत्या वापरामुळे पारंपरिक मातीच्या पणत्यांना मागणी कमी होत चालली आहे.
लोकांनी देशी मातीच्या पणत्या विकत घेतल्या तर पारंपरिक व्यवसाय टिकून राहील आणि स्थानिक अर्थचक्रालाही चालना मिळेल.दिवाळी पर्यावरणपूरक आणि स्वदेशी बनवण्यासाठी “एक दिवा मातीचा लावा” असा संदेश दिला. दिवाळीत मातीच्या पणत्यांनाच प्राधान्य द्या आणि स्थानिक कारागिरांना साथ द्या. असे आवाहन कुंभार समाज संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा भाजपा नेते संजय जोरले ज्येष्ठ नेते उमाजी सुर्यवंशी, मनोहर तांगडे, मनोहर मरकड, ज्ञानेश्वर महस्के ,रविंद्र पवार, सोमनाथ पवार सोशल मीडिया सरचिटणीस, जिल्हा अध्यक्ष रामदास इंगळे आदींनी केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.