
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनीही मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी कंबर कसली असून नुकत्याच त्यांनी
.
मुंबई महानगर पालिकेची निवडणूक काही महिन्यात होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. भाजपनेही निवडणुकीची मोठी तयारी केली आहे. शिवसेना ठाकरे गटाने मराठीचा मुद्दा पुढे आणला आहे. तर मनसेनेही मराठी मुद्द्यावरुन तयारीला सुरूवात केली आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे यांनी सुधीर साळवींवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
नेमके काय म्हणाले उद्धव ठाकरे?
शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, सुधीरवर मोठी जबाबदारी दिली आहे, तुम्ही लालबागकर आहात. सुधीर आता लालबागमध्ये राहिला, त्याला शिवसेनेचे सचिवपद दिले आहे. लालबाग परळ म्हणजे कट्टर शिवसैनिक आलाच. काल परवा बातम्या आल्या उद्धव ठाकरे यांची मोठी खेळी. आपली खेळी मोठीच असते लक्षात ठेवा. पण, आपले लक्ष आता मुंबई महानगरपालिका आहे, त्यासाठी सुधीरला सचिव पद दिलेले आहे. मी सुधीरला मुंबईत पळवणार आहे, सर्वच एकत्र आहात, एकजुटीने रहा. मुंबई आणि महाराष्ट्रावरील संकट बाजूला टाकण्यासाठी आपण एकत्र आहोत.
साळवींना विधानसभेला नाकारली होती उमेदवारी
दरम्यान, सुधीर साळवी हे सुप्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गेले 20 वर्षे मानद सचिव आहेत. गत विधानसभा निवडणुकांवेळी सुधीर साळवी यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केली होती. मात्र, विद्यमान आमदार अजय चौधरी यांनाच तिकीट देण्यात आल्यामुळे सुधीर साळवी यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते. मात्र, आता उद्धव ठाकरे यांनी सुधीर साळवी यांना सचिवपदाची जबाबदारी देण्यासोबतच आगामी मुंबई महापालिका निवडणुकांचेही मिशनही दिल्यामुळे आता कार्यकर्त्यांची नाराजी दूर झाल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा…
भाजपची मानसिकता महाराष्ट्रावरील आक्रमणकर्त्यांसारखी:आदित्य ठाकरे यांचा घणाघात, अमित शहांच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंनाही लगावला टोला
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल रायगड दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरी जेवणासाठी गेले होते. यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला आहे. काल पौर्णिमा होती, काल काही लोक गावी पण जाऊन आले असतील, आणि मग ते ज्यांना भेटले त्यांनी थोडी काळजी घ्यावी, आमच्या अनुभवावरून सांगतो. बाकी काही नाही, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे. पूर्ण बातमी वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.