
उद्धव ठाकरे असेच बोलत राहतात. महाविकास आघाडीच्या काळात 1000 बाबी आमच्याकडे आहेत. आता आरोप-प्रत्यारोपाचे दिवस नाही. आमच्या सरकारला मोठे बहुमत जनतेने दिले आहे. आम्हाला 52 टक्क्यापेक्षा जास्त मते मिळाली आहेत. आज आमचा फोकस जनतेचे कामं करण्यावर आहे, असे भ
.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांचे सरकार वचनपूर्तीसाठी काम करत आहे. आता कुणी आरोप-प्रत्यारोप केला यात पडायचे नाही. आम्हाला विकसित महाराष्ट्राचा संकल्पावर काम करायचे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार मराठवाडा, विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्र याचा विकास कसा करेल यावर आमचा फोकस आहे.
विभागीय आयुक्तालयाचे विभाजन गरजेचे
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मराठवाड्याला न्याय द्यायचा असेल तर एक विभागीय आयुक्त कार्यालय नांदेड भागात असले पाहिजे. त्याला जर कुणी विरोध करत असेल तर आम्ही त्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीशी चर्चा करु. छत्रपती संभाजीनगरला 8 जिल्ह्याचे विभागीय आयुक्त कार्यालय असणे त्यापेक्षा नांदेड-लातूर हा भाग महत्त्वाचा आहे.आणि आम्ही लोकप्रतिनिधी बसून नांदेडमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासाठी मार्ग काढू. म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक होईल. या चार जिल्ह्याला न्याय मिळावा यासाठी मी लक्ष घालणार आहे. विभागीय आयुक्तालय संभाजीनगरला आहे, त्यांचे विभाजन केले पाहिजे. नांदेड किंवा लातूर असा वादच नाही. लवकरच याचा निर्णय होईल.
देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुटणार नाही
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणी ज्या बाबी करायची गरज होती त्या सर्व बाबींवर सरकारने काम केले आहे. त्यांच्या कुटुंबियांची काही मागणी असेल तर आपण ती देखील पूर्ण करू. ज्या ज्या चौकश्या अपेक्षात आहे त्या चौकश्या आम्ही पूर्ण करणार आहोत. मला विश्वास आहे देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुटणार नाही. फाशीची शिक्षा मिळावी यासाठी आमचे सरकार मागे लागणार आहे. कुठलाही पुरावा नष्ट होणार नाही, यासाठी फडणवीस योग्य ती खबरदारी घेत आहेत.
पक्षसोडून गेलेल्यांना पुन्हा पदं दिली नाही
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ज्या लोकांनी विधानसभा निवडणुकीवेळी पक्षासोबत बंडखोरी केली त्यांना आम्ही पक्षामध्ये कमी केले असेल तरी कालांतराने एक चर्चा होती. त्यांना महत्त्वाची पदे न देता विकासासाठी भाजपसोबत घेतले आहे. त्यांना काही पद देण्यात आलेले नाही.
वाळू धोरणासाठी येणाऱ्या काळात कडक उपाययोजना
महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, सर्व सामान्य नागरिकांना वाळू उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने कडक उपाययोजना करण्यात येणार आहेत. अधिकाऱ्यांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता, न घाबरता महसूलचे काम करावे. त्यासाठी प्रशासनामार्फत शस्त्रधारी कर्मचारी महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्याचे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.