
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव हे सध्या नाराज असल्याचे दिसून येत आहे. माझ्या क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही, हे दुर्दैव असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे उद्धव ठाकर
.
या विषयी एका वृत्त वाहिनीशी बोलताना भास्कार जाधव म्हणाले की, माझी राजकारणाची सुरुवात झाली त्याच वेळी मला हिंदुह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर भाषण करण्याची संधी मिळाली. त्यावेळच्या शिबिरात मला हमखास भाषण करायला संधी मिळायची. त्या वेळेला शिवसेना नेते कै. मनोहर जोशी सरांना बाळासाहेब अनेक वेळा म्हणाले की, या मुलाला महाराष्ट्रात फिरवायचे आहे. या मुलाला महाराष्ट्रात फिरवले तर ग्रामीण भागातला, तळागाळातला मानूस आपल्या सोबत जोडला जाईल. असे शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद मला लाभले. महाराष्ट्र मध्ये मला मानणारा एक वर्ग आहे, मी लोकांशी संवाद साधतो त्यावेळी त्यात कोणताही नाटकीपणा नसतो, मला खोटे बोलण्याची सवय नाही. महाराष्ट्रातील लोकांना हे भावते. मात्र प्रत्येक वेळी माझे दुर्दैव आडवे आले आहे. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही, हे माझे दुर्दैव असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
उदय सामंत यांचेही कौतुक
गेल्या काही दिवसांपासून मंत्री उदय सामंत खरोखरच माझ्याबद्दल मोठ्या आदराने बोलत आहेत. तसे ते वागत सुद्धा आहेत. त्यांच्या मनात काय असेल ते माहीत नाही. परंतु चार चौघांमध्ये वागत असताना माझ्या ज्येष्ठतेचा, माझ्या अनुभवाचा त्यांनी बऱ्याच वेळा उल्लेख केलेला आहे. अशात ते माझ्याबद्दल आदराने देखील बोलायला लागले आहेत. म्हणूनच मी त्यांना एवढेच सांगेल की, तुमचे हे प्रेम, तुमचा हा आदर असाच कायम ठेवा. अशा शब्दात भास्कर जाधव यांनी उदय सामंत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
पक्षाला उपयोग करता आला नाही हे पक्षाचे दुर्देव – उदय सामंत
भास्कर जाधव हे अतिशय प्रामाणिक आणि काम करणारे नेते आहेत. त्यांचा कामाचा पक्षाला उपयोग करून घेता आला नाही. हे त्यांच्या पक्षाचे दुर्दैव असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. भास्कर जाधव यांच्या नाराजी वर उदय सामान त्यांनी प्रतिक्रिया देताना हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता या प्रकरणाची चर्चा चांगलीच रंगली आहे. उदय सामंत हे मागील काही दिवसापासून भास्कर जाधव यांच्या कामाचे वारंवार कौतुक करताना दिसत आहेत. इतकंच नाही तर ते शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू असे देखील सामंत यांनी म्हटले होते.
भास्कर जाधव यांच्याशी चर्चा करु – संजय राऊत
कोकणातील एकमेव नेते भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. यावरुन देखील संजय राऊत यांनी स्पष्टिकरण दिले आहे. त्यांच्याशी आमची काल देखील चर्चा झाली होती. आज शिवसेनेतील सर्व नेते एकत्र भेटत आहेत. कोणाची काही खंत असेल त्याच्यावर आम्ही चर्चा करणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.