
शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. अबू आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया देताना संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसे
.
संजय निरुपम म्हणाले, सर्वप्रथम, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हे मान्य करावे की अबू असीम आझमी हे महाविकास आघाडीचा भाग आहेत. जेव्हा आझमी यांनी निवडणूक लढवली तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला होता आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतः शाल देऊन त्यांचे स्वागत केले. जर आपण एकनाथ शिंदेंबद्दल बोलत असू, तर जर कोणी विरोधी पक्षातून असेल तर त्यांना भेटण्यात काहीच गैर नाही. एका कार्यक्रमात टेबलावर बसलो होतो. पण याचा अर्थ असा नाही की आपण त्याला विरोध करणार नाही. उद्धव ठाकरेंची शिवसेना अबू असीम आझमी यांचा उघडपणे निषेध करू शकत नाही. कारण जर त्यांनी निषेध केला तर त्यांच्या मुस्लिम मतांना बाधा येईल.
यावेळी बोलताना संजय निरुपम यांनी कॉंग्रेसवर देखील निशाणा साधला आहे. संजय निरुपम म्हणाले, मुंबई काँग्रेस कार्यालयाला लवकरच टाळे लागणार आहे. पी. डब्ल्यू. डी. आवारात असलेल्या काँग्रेस कार्यालयाचे 18 लाख भाडे सरकारला दिलेले नाही. मागील अनेक महिन्याचे वीज बिल न भरल्यामुळे वीज कंपनीने मीटर काढून नेले आहे. काँग्रेस कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहा महिंन्यापासून पगार नाही. शिवसेना ठाकरे गटासोबत युती केल्यामुळे काँग्रेस संपली, असेही संजय निरुपम म्हणाले.
पुढे बोलताना संजय निरुपम म्हणाले, मुंबईत फक्त तीन आमदार निवडून आलेत तेही मुस्लिम मतांमुळेच निवडून आले आहेत. काँग्रेसचे नेते काल मुंबईत यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी आले होते असे म्हणत त्यांनी राहुल गांधी यांना देखील टोला लगावला आहे. अनेक मुस्लिम आता शिवसेना ठाकरे गटाकडे गेले आहेत. मल्लिकार्जुन खरगे प्रचंड जातीवादी असून वेणुगोपाल देखील अकार्यक्षम आहेत, असा आरोपही यावेळी निरुपम यांनी केला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.