digital products downloads

‘उद्धव-राज यांना एकत्र तर येऊ द्या, मग काय…’; रोहित पवारांच्या ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण

‘उद्धव-राज यांना एकत्र तर येऊ द्या, मग काय…’; रोहित पवारांच्या ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण

Rohit Pawar On Thackeray Alliance: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवारी रात्री उशीरा मुंबईत परतले आहे. परदेशातून राज ठाकरे मुंबईत परतण्याच्या काही तास आधीच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात केलेल्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे अशी इच्छा मागील काही आठवड्यांपासून कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. तशा आशयाची बॅनरबाजीही झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र असं असतानाच दोन्ही ठाकरे बंधू परदेशात होते. मात्र राज्यातील राजकारणामध्ये हे दोघेही एकत्र येण्यासंदर्भातील चर्चा सुरुच असतानाच रोहित पवार यांनी यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. पुण्यातील खेड राजगुरुनगर येथे मंगळवारी रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात विचारण्यात आलं असता त्यांनी एक सूचक विधान केलं.

ठाकरेंच्या युतीबद्दल रोहित पवारांचं सूचक विधान

मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या दोन्ही बंधू एकत्र येण्यासंदर्भातील भावनांचा संदर्भ देत रोहित पवारांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आधी एकत्र तर येऊ द्या, मग काय करायचं ते ठरवू” असं उत्तर दिलं. त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र आले तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची काही वेगळी भूमिका असेल असं रोहित सूचित करु इच्छितात की या विधानाचा इतर काही अर्थ आहे याबद्दल चर्चांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष असलेला शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला कसा प्रतिसाद देतो हे गूढ रोहित पवारांच्या विधानाने अधिक वाढलं आहे. 

महायुती सरकार कधीपर्यंत टीकणार हे ही सांगितलं

रोहित पवार यांनी यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना महायुती सरकार 2029 च्या लोकसभेपर्यंत टिकेल पण विधानसभा निवडणुकांआधी ही युती तुटेल असंही म्हटलं आहे. भाजपाकडून संघटन पर्वाच्या माध्यमातून ताकद वाढवण्यासाठी आणि पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 2029 च्या निवडणुकीमध्ये एकहाती सत्ता मिळवण्याचा भाजपाचा मानस लपून राहिलेला नाही. अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या मंचांवरुन यासंदर्भात सूचक विधानं केलेली आहेत. याच साऱ्याचा संबंध लावत रोहित पवारांना नेमकं काय म्हणायचं आहे याबद्दल उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. 

राष्ट्रवादीनेही एकत्र येण्याची मागणी

ठाकरे बंधू एकत्र येणार या बातम्यांची चर्चा असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दोन्ही राष्ट्रवादींनी पुन्हा एकत्र यावं अशी इच्छा उघडपणे बोलून दाखवल्याचं दिसून आलं आहे. मागील काही काळामध्ये वेगवेगळ्या कामांनिमित्त शरद पवार आणि अजित पवार एकाच बैठकींना अनेकदा दिसून आल्याने ठाकरेंप्रमाणे राष्ट्रवादीमध्येही पुन्हा मनोमिलन होणार का याबद्दलच्या चर्चा रंगू लागल्यात.

ठाकरे काय निर्णय घेणार?

राज ठाकरे मुंबईत दाखल झाले असले तरी उद्धव ठाकरे 4 मे रोजी मुंबईत परतणार असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे ठाकरे बंधू खरोखरच एकत्र येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp