
Maharashtra Weather News : सध्या महाराष्ट्रात उन्हाचा पारा चांगलाच वाढलेला आहे. अनेक ठिकाणी तापमान 40 अंशांच्या पुढे गेलंय. याच उष्णतेमुळे पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेलाय. एका शाळकरी मुलाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीये.
उन्हाचा तडाखा ठरतोय जीवघेणा
बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी
काळजी घेण्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला
सध्या राज्यात सूर्य चांगलाच तापलेला दिसतोय. तापमानाचा पारा वाढलेला असताना डिहायड्रेशनसह अनेक शारिरीक त्रास जाणवू लागलाय. उन्हाच्या झळा वाढल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या एका शाळकरी मुलाचा उष्माघाताने मृत्यू गेलाय. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांची आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
जागतिक हवामान तज्ञांनी अल निनोच्या प्रभावामुळे तापमानात वाढ होऊ शकते अशी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळेच भारतातील बहुतांश भागात तापमान जोर धरू लागलंय.
उष्माघात ही एक गंभीर वैद्यकीय समस्या आहे. शरीराचे तापमान अचानक वाढल्याने आणि घाम येणे थांबल्याने ही समस्या उद्भवते.
उष्माघाताची काही प्रमुख लक्षणे
— शरीराचे तापमान 104°F (40°C) किंवा त्याहून अधिक असणे
— त्वचा लाल आणि कोरडी पडणे
— तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे आणि भोवळ येणे
— मळमळ आणि उलटी होणं, श्वास घेण्यास त्रास, हृदयाचे ठोके वाढणे
बचावासाठी काय काळजी घ्याल
— भरपूर पाणी प्या आणि शरीर हायड्रेटेड ठेवा
— हलके आणि सैलसर कपडे परिधान करा
— दुपारच्या कडक उन्हात बाहेर फिरणे टाळा
— बाहेर जाणार असाल तर डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ वापरा
— मद्यपान आणि चहा-कॉफीसारखी पेये टाळा.
बुलढाण्यात उष्माघातामुळे चिमुकल्याचा मृत्यूने उन्हाच्या धोक्याची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी निष्काळजीपणा न करता योग्य ती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.