digital products downloads

‘एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी रामदास कदम…’ ‘टू द पॉइंट’मध्ये सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट!

‘एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी रामदास कदम…’ ‘टू द पॉइंट’मध्ये सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट!

Sushma Andhare Interview: बाळासाहेबांच्या मृत्यू प्रकरणावरून रामदास कदमांनी गौप्यस्फोट केलाय. दरम्यान यानंतर परबांनी थेट कदमांच्या बायकोलाच या वादात ओढलंय. परबांनी ज्योती कदमांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर रामदास कदमांनी परबांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिलाय. या सर्वात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केलाय. रामदास कदमांनी नेमकं काय विधान केलं होतं? त्याला अनिल परबांनी काय उत्तर दिलं? यातून कसा वाद सुरुय? याप्रकरणावर सुषमा अंधारे नेमक्या काय म्हणाल्या? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

दसरा मेळाव्यात रामदास कदम यांच्या वादग्रस्त विधानांनी शिवसेनेत नव्या वादाची ठिणगी पेटवली असून, ठाकरे गटाकडून आक्रमक प्रत्युत्तर सुरू झाले आहे. कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावेळी मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवल्याचा आणि हाताचे ठसे घेतल्याचा आरोप केला, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यावर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी कडाक्याच्या प्रतिक्रिया दिल्या असून, कदम यांचा हेतू एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणणे असल्याचा गौप्यस्फोट सुषमा अंधारे यांनी केलाय. झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत त्यांनी विविध प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. दसरा मेळाव्यातील या घडामोडींमुळे आगामी पालिका निवडणुकीपूर्वी वैयक्तिक हल्ल्यांचा धडाका वाढला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावेळी मृतदेह दोन दिवस ठेवल्याचा आणि हाताचे ठसे घेतल्याचा दावा केला. त्यांनी डॉक्टरांवर शंका व्यक्त करत प्रेसला माहिती का देण्यात आली नाही असा सवाल उपस्थित केला. नितेश राणे यांनीही या दाव्याला दुजोरा देत उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. कदम यांनी सीबीआय चौकशीची मागणी करत शिंदे यांना विनंती केली, परंतु हे विधान अतिवृष्टी नुकसानासारख्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे ठाकरे गट सांगतोय.

सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट

ठाकरे गटाच्या नेत्यांपैकी सुषमा अंधारे यांनी कदम यांच्यावर थेट हल्ला चढवला. कदम यांना एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा हेतू असल्याचा ‘टू द पॉईंट’ आरोप करत त्या म्हणाल्या, “उदय सामंत यांचे कोकणातील वाढते प्रस्थ आणि त्यांच्या मुलाच्या गृहराज्यमंत्री पदावरील छाप्यांना शिंदे रोखू शकले नाहीत, याचा राग कदमांच्या मनात आहे. त्याचं उत्तम काढण्यासाठी बाळासाहेबांवरून हल्ला सुरू केला.” अंधारे यांनी कदम यांच्या कोकणातील अस्तित्व नामशेष होत असल्याचा टोमणा मारला.

अनिल परबांचे प्रत्युत्तर

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत कदम यांच्या प्रत्येक दाव्याची पोलखोल केली. “कदम यांचा नीचपणा असा आहे, बाळासाहेबांच्या अंतिम क्षणी ते मातोश्रीवर होते आणि सर्व घडामोडींचे साक्षीदार,” असं म्हणत परब यांनी मृतदेहाच्या मुद्द्यावर शरद पवार यांच्या आक्षेपाचा उल्लेख केला. कदम यांना अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा देत त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. परब यांनी शिंदे गटावर १०० अपराधांचा आरोप करत, “१२-१४ वर्षांनी हे दावे का? असा सवाल उपस्थित करत पालिका निवडणुकीसाठी राजकारण सुरु असल्याचे ते म्हणाले.

ठाकरे, राऊत काय म्हणाले? 

उद्धव ठाकरे यांनी कदम यांना ‘गद्दार’ संबोधत उत्तर देण्याची गरज नसल्याचे म्हटले, “हे सगळे पोरं-बाळं नाचवणारे लोक आहेत.” संजय राऊत यांनी कडक शब्दांत हल्लाबोल केला, “बाळासाहेबांच्या मृत्यूनंतरची विटंबना करणाऱ्यांना जबर किंमत मोजावी लागेल. मी शेवटच्या क्षणापर्यंत उपस्थित होतो, लाज वाटली पाहिजे.” असे म्हणात राऊत यांनी कदम यांच्या दाव्यांना खोडून काढले. 

FAQ

प्रश्न: सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांच्यावर कोणता गौप्यस्फोट केला आहे?

उत्तर: सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांच्यावर आरोप केला की, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंदर्भातील वादग्रस्त विधान करून एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. अंधारे यांच्या मते, उदय सामंत यांचे कोकणातील वाढते प्रस्थ आणि त्यांच्या मुलाच्या गृहराज्यमंत्री पदावरील छाप्यांना शिंदे रोखू न शकल्याने कदम नाराज आहेत. याचाच सूड म्हणून कदमांनी बाळासाहेबांबाबत खळबळजनक दावे करून शिंदे गटाला अडकवण्याचा डाव खेळल्याचा अंधारे यांचा दावा आहे.

प्रश्न: रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत कोणते आरोप केले आणि त्याला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर काय आहे?

उत्तर: रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवल्याचा, त्यांच्या हाताचे ठसे घेतल्याचा आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर शंका व्यक्त करत प्रेसला माहिती का देण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित केला. यावर अनिल परब यांनी कडक प्रत्युत्तर देत कदम यांच्या दाव्यांना तथ्यहीन ठरवले आणि अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला. उद्धव ठाकरे यांनी कदम यांना ‘गद्दार’ संबोधत टीका केली, तर संजय राऊत यांनी कदम यांना विटंबना करणारे ठरवले.

प्रश्न: या वादाचे राजकीय परिणाम आणि पालिका निवडणुकीशी कसा संबंध आहे?

उत्तर: सुषमा अंधारे आणि अनिल परब यांनी हा वाद आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्याचे संकेत दिले. परब यांनी कदम यांचे विधान अतिवृष्टी नुकसानासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेत शिंदे गटावर हल्ला चढवला आहे. कदम यांच्या आरोपांमुळे शिंदे गटात अंतर्गत अस्वस्थता निर्माण झाली असून, या वादाचा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp