digital products downloads

‘एकनाथ शिंदे सर्वात कच्चं मडकं,’ संजय राऊतांनी सगळंच काढलं, म्हणाले ‘ गुजराती काय उपकार करतात का?’

‘एकनाथ शिंदे सर्वात कच्चं मडकं,’ संजय राऊतांनी सगळंच काढलं, म्हणाले ‘ गुजराती काय उपकार करतात का?’

Sanjay Raut on Eknath Shidne:  एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील अत्यंत कच्चं मडकं आहेत. सध्याच्या राजकीय स्थितीला ते गोंधळले आहेत. त्यातून ते अशी विधानं करत आहेत अशी टीका खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ‘जय गुजरात’ विधानावरील स्पष्टीकरणावरुन केली आहे. तसंच देवेंद्र फडणवीसच एकनाथ शिंदेंना अडचणीत आणत आहेत. वारंवार अशा भूमिका घ्या असं उत्तेजन देत आहेत असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

“एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील अत्यंत कच्चं मडकं आहेत. सध्याच्या राजकीय स्थितीला ते गोंधळले आहेत गुजरात पाकिस्तानात आहे असं आम्ही कुठे म्हणत आहोत. गुजरात, महाराष्ट्र कधीकाळी एकच होता हे एकनाथ शिंदेंना माहिती नाही. बडोदा हे गायकवाडांचं मराठा संस्थान आहे. संपूर्ण गुजरातवर भोसल्याचं राज्य होतं. म्हणून अमित शाह किंवा मोदी बडोद्याला गेल्यानंतर जय महाराष्ट्र म्हणत नाही. इंदूर, ग्वाल्हेर ही होळकर आणि शिंदेंची मराठी राज्यं आहेत. पेशवे पण तिेथेच गेले होते हे फडणवीसांना सांगू इच्छितो. इतिहास मलाही त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे. अजूनही त्यांची राजघराणी आहेत म्हणून योगी आदित्यनाथ जय महाराष्ट्र नाही तर जय उत्तर प्रदेश म्हणतात. त्यामुळे उगाच सारवासारव करु नका. महाराष्ट्राचा अपमान करण्याचा आपण प्रयत्न करत आहात”. 

 

पुढे ते म्हणाले की, “खरं तर देवेंद्र फडणवीसच एकनाथ शिंदेंना अडचणीत आणत आहेत. वारंवार अशा भूमिका घ्या असं उत्तेजन देत आहेत. गुजरातच्या बांधवांनी महाराष्ट्रात विकासकामं केली. मग संपत्ती, पैसे नाही का कमावले? उपकार करतात का? पारशी समाजाने सर्वात जास्त योगदान केलं आहे. असं बोलून मराठी माणसाचं अपमान करत आहात. ही मुंबई मराठी मजुरांच्या सैनिकांच्या गिरणी कामगारांच्या घामातून रक्तातून निर्माण झाली आहे.  शेठजींच्या पैशातून निर्माण झालेली नाही”. 

“एकनाथ शिदेंनी माफी मागायला हवी. त्यांची तरफदारी केल्याबद्दल आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल फडणवीसांनीही माफी मागायला हवी. तुम्ही इथेच पैसे कमावताय, संपत्ती निर्माण करताय आणि त्या संपत्तीतून एखादा हॉल बांधला तर दादागिरी करुन दाखवता. तेदेखील शिंदेंच्या जीवावर…मग आम्ही गुंड आहोत”, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. 

विजयी मेळाव्याचा कार्यक्रम कसा असेल? 

संजय राऊतांनी सांगितलं आहे की, “या कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट आहे. मराठी जनतेला उद्धव आणि राज ठाकरे हे दोन नेते भाऊ यांना पाहायचं आहे. मराठी माणसाला, महाराष्ट्राला त्यांनी दिशादर्शन करावं अशी जनतेची इच्छा आहे. सर्वांना मिळून हे दृश्य पाहायचं आहे. 11.30 वाजता या सोहळ्याला सुरुवात होईल. गाण्याचा वैगेरे कार्यक्रम होणार नाही. हजारो लोकांसाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. राज्यगीत वाजवलं जाईल. वरळीतील कोळी बांधवांचं बँड पथक आहे. त्या माध्यमातून संस्कृतीचं दर्शन आणि जल्लोष होईल. जर इतर पक्षांचे कोणी प्रमुख नेते आले तर त्यांनाही मराठी बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी मंचावर आमंत्रित करु. अजित भुरे सूत्रसंचालन करतील. सर्वात शेवटी एकत्रित उद्धव, राज यांना आमंत्रित केलं जाईल आणि या दोघांनी महाराष्ट्राला मराठी माणसाला संबोधित करावं असं कार्यक्रमाचं नियोजन आहे. सभागृहाच्या बाहेरही मोठ्या स्क्रीन लावून, हाजी अलीच्या रस्त्यापर्यंत हा सोहळा पाहता यावा याचीही व्यवस्था केली आहे”. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp