
औंढा नागनाथ येथे नागनाथ संस्थानची संरक्षण भिंत बिल्डऱ्चया सोयीसाठी पाडण्यात आली असून यामुळे भाविकाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई करावी अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा भाविकांनी एका निवेनदाद्वारे दिला आह
.
या संदर्भात ठाकरे गटाचे तालुका प्रमुख गणेश देशमुख, जी. डी. मुळे, नंदू पाटील, राम काळे, विकास देशमुख, संतोष रेनके, सुनील खंडागळे, अनिल शिंदे, आकाश सुतारे, शैलेश मुधळ याच्यासह भाविकांनी संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदा हरिष गाडे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
औंढा नागनाथ संस्थानच्या संरक्षण भिंतीला लागूनच एका बिल्डरकडून बांधकाम केले जात आहे. त्यांच्या बांधकामाच्या सोयीसाठी चक्क या ठिकाणी असलेल्या संरक्षण भिंतीचा भाग पाडून टाकण्यात आला आहे. या ठिकाणी बिल्डरच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य ठेवण्यासाठीच हि भिंत पाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात काही भाविकांनी विचारणा केली असता भिंत जिर्ण झाली असल्यामुळे पाडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक संस्थानची संपूर्ण संरक्षण भिंत सुस्थितीत असतांनाही केवळ बिल्डरच्या बांधकामाच्या ठिकाणीच भिंत जिर्ण कशी झाली असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
या ठिकाणी भिंत पाडण्यासाठी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी घेतली होती काय, तसेच सदर भिंत पाडण्यसाठी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्थळ पाहणी केली होती काय असा सवाल उपस्थित करण्यात आला असून सुस्थितीत असलेली भिंत पाडणाऱ्यांवर तसेच भिंत पाडण्यासाठी परवानगी देणाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.