digital products downloads

‘कर्ज काढा पण शेतक-यांचं कर्जमाफ करा’, कर्जमाफीवरून अब्दुल सत्तारांचा सरकारला घरचा आहेर

‘कर्ज काढा पण शेतक-यांचं कर्जमाफ करा’, कर्जमाफीवरून अब्दुल सत्तारांचा सरकारला घरचा आहेर

Abdul Sattar : शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी केलीय. शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी सत्तारांनी सरकारला एक सल्ला देखील दिलाय. कर्जमाफीची मागणी करत सत्तारांनी थेट सरकारलाच घरचा आहेर दिलाय. 

Add Zee News as a Preferred Source

माजी कृषीमंत्री आणि सत्ताधारी आमदार अब्दुल सत्तारांनी कर्जमाफीवरून सरकारला घरचा आहेर दिलाय, कर्ज काढा पण शेतक-यांचं कर्जमाफ करा असं आवाहन सत्तारांनी थेट सरकारला केलंय. सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्धवस्त झालाय. सोन्यासारखं पीक मातीमोल झाल्यानं शेतकरी हतबल झालाय. त्यामुळे शेतक-यांचं कर्जमाफ करण्याची मागणी जोर धरू लागलीय.

अब्दुल सत्तारांनी केलेल्या वक्तव्याचं विरोधकांनी समर्थन केलंय. अब्दुल सत्तार योग्यच बोलले असून सरकारनं शेतक-यांची कर्जमाफी करावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केलीय. तर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफ करण्याचा शब्द दिल्याचं उदय सामंतांनी म्हटलंय.

पावासानं शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. त्यामुळे शेतक-यांच्या मदतीसाठी सरकारनं देखील मदतीसाठी विशेष पॅकेजी घोषणा केलीय. मात्र, जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सरकारनं कर्जमाफी करावी अशी मागणी विरोधकांकडून सातत्यानं होतेय..

लवकरात लवकर शेतक-यांची कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलीय. कर्जमाफ न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. कर्जमाफ करण्यासाठी विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मात्र, आता सत्ताधारी आमदारांनीच कर्जमाफीची मागणी करत सरकारला ठणकावलंय.

FAQ : 

अब्दुल सत्तार यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत काय मागणी केली?
उत्तर: शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार आणि माजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली. त्यांनी सरकारला सल्ला दिला की, “कर्ज काढा पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा.” यातून त्यांनी सरकारला थेट घरचा आहेर दिला आहे.

 शेतकरी कर्जमाफीची मागणी का वाढली आहे?
उत्तर: सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं सोन्यासारखं पीक मातीमोल झालं. शेतकरी उद्ध्वस्त आणि हतबल झाले असल्याने कर्जमाफीची मागणी जोर धरू लागली आहे. पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांची स्थिती आणखी बिकट झाली.

विरोधकांनी अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याला काय प्रतिसाद दिला?
उत्तर: विरोधकांनी सत्तारांच्या मागणीचं समर्थन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं की, सत्तार योग्य बोलले असून सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. शिवसेना (UBT) चे नेते उद्धव ठाकरेंनी लवकरात लवकर कर्जमाफी करण्याची मागणी केली आणि न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.

 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp