
मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत गुरूवारी 556 फ्लॅट्सच्या चाव्या लाभार्थ्यांना वाटप करण्यात आल्या. यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या लाभार्थ्यांना फ्लॅट्सच्या चाव्या मिळाल्या
.
अजित पवार म्हणाले की, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आमच्या आई-वडिलांसमान व्यक्ती आपल्या हक्काच्या घराच्या चाव्या घेत होते. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान ओसंडून वाहत होते. यानिमित्ताने अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले. मी 1991 पासून सार्वजनिक जीवनात कार्यरत आहे. सरकारी कामाच्या उद्धाटनाला जाताना मी तेथील बांधकामाची बारकाईने पाहणी करतो. माझे त्यासंबंधीचे शिक्षण झाले नाही. पण मी येथील कामाची पाहणी करत होतो. या कामात मला एकही चूक सापडली नाही. आपण येथील 1920 चा चाळ काढली. ब्रिटिशांनी बांधलेल्या या चाळीत अनेकांनी वास्तव्य केले.
इथे कोकणातील लोक राहिले. बारामतीची एक महिला भेटली. बीडीडी चाळ म्हणजे मिनी भारतच आहे. सरकारने आता झोपडपट्टी मुक्त मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे शहरातील रखडलेले पुनर्विकासाचे प्रकल्प लवकरच पूर्ण होतील.
धारावीतही दर्जेदार काम करून दाखवणार
कष्ट करणाऱ्यांनी नेहमी मोठी स्वप्न पाहावी. काम होणारच असा विश्वास ठेवावा. आज सरकार बीडीडी चाळीत राहणाऱ्या नागरिकांना 500 चौरस फुटांचे घर देत आहे. एका व्यक्तीने मला सांगितले की, 35 व्या मजल्यावरून संपूर्ण मुंबई दिसत आहे. आपल्या शेजारी नमन बिल्डिंग आहे. तेथील फ्लॅट 2 लाख चौरस फुट दराने विकला गेला. त्यापासून काहीसे बाजूलाच आपण आहतो. मुंबईकरांना चांगल्या दर्जाचे फ्लॅट मिळालेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो की, आम्ही धारावीतही असेच काम करून दाखवणार आहोत, असे अजित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, बीडीडी चाळीला खूप मोठा इतिहास आहे. या चाळीने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली. या चळवळीत बलिदान दिलेल्या हुतात्म्यांपैकी अनेकांचे वास्तव्य या चाळीत होते. त्यामुळे चाळीतून टॉवरमध्ये गेलात तरी आपली संस्कृती तुटू देऊ नका. तुम्ही आपले संपूर्ण आयुष्य इथे जगलात, हे घर तुमचे आहे. त्यामुळे तुम्ही भविष्यात कोणत्याही मोहाला बळी पडू नका. मुख्यमंत्र्यांनी चाव्या देताना ही घरे किमान 10 ते 15 वर्षे विकता येणार नाहीत असे काहीतरी केले पाहिजे.
कष्टकरी माणूस मुंबईबाहेर जाऊ देऊ नका
आपला मुंबईकर मुंबईतच राहिला पाहिजे. कष्टकरी माणसाला मुंबईबाहेर जाऊ देऊ नका. कुणीही मुंबईबाहेर जाता कामा नये. या घरांसाठी प्रत्येक गोष्ट दर्जेदार वापरण्यात आली आहे. इथे जॅग्वॉरचा नळाचा कॉक वापरण्यात आला आहे. छोटे-छोटे नटही चांगल्या दर्जाचे वापरण्यात आलेत. ते किमान 100 वर्षे टिकतील. त्यामुळे काही झाले तरी तुम्ही तुमच्या कष्टाचा ठेवा विकू नका. नागरिकांनी बाकीच्या चाळी खाली करून दिल्यास त्या ठिकाणी सरकार 4 वर्षांत घर बांधून देण्याचा प्रयत्न करेल, असेही अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.