digital products downloads

काँग्रेसची ‘सत्याग्रह यात्रा’ नसून ‘असत्ययात्रा’: भाजपची टीका, राहुल गांधी रोज खोटे बोलतात, मग सत्याग्रहाचा अधिकार कुठून? – नवनाथ बन – Mumbai News

काँग्रेसची ‘सत्याग्रह यात्रा’ नसून ‘असत्ययात्रा’:  भाजपची टीका, राहुल गांधी रोज खोटे बोलतात, मग सत्याग्रहाचा अधिकार कुठून? – नवनाथ बन – Mumbai News


कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने मतचोरीचा आरोप केला आहे. केंद्र सरकारवर तसेच महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीवरून राहुल गांधी यांनी मतदानात घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. त्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या वतीने महाराष्ट्रात सत्याग्रह या

.

नवनाथ बन म्हणाले, कॉंग्रेसच्या वतीने महाराष्ट्रात सत्याग्रह यात्रा सुरू करण्यात आली आहे. खरेतर ही सत्याग्रह यात्रा नसून असत्य यात्रा आहे. कारण यांचे नेते राहुल गांधी रोज माध्यमांसमोर येऊन खोटे बोलत आहेत. मतचोरी झाली, अशा पद्धतीचा खोटा आरोप करत आहेत. त्यामुळे कॉंग्रेसला सत्याग्रह यात्रा काढण्याचा अधिकार नाही, असे नवनाथ बन यांनी म्हटले आहे. तसेच यात्रा काढायचीच असेल तर असत्य यात्रा काढली पाहिजे. तेच राहुल गांधींना शोभून दिसते. राहुल गांधी यांनी असत्य यात्रा काढली तर त्याला जास्त प्रतिसाद मिळेल हे कॉंग्रेसच्या लोकांनी ध्यानात घ्यावे, असेही बन यांनी म्हटले आहे.

हर्षवर्धनजी तुम्हाला अजून कॉंग्रेस कळलेली नाही

पुढे बोलताना नवनाथ बन म्हणाले, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर केवळ टीका करत आहेत. अहो हर्षवर्धनजी तुम्हाला अजून कॉंग्रेस कळलेली नाही. संपूर्ण कॉंग्रेस आधी समजून घ्या, मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर टीका करा, असे बन यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेसची महाराष्ट्रातील अवस्था काय आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथल्या 140 कोटी जनतेने आशीर्वाद दिले, तर देवाभाऊंना महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेने आशीर्वाद दिले आहेत. त्यामुळे मोदीजी पंतप्रधान आणि देवाभाऊ मुख्यमंत्री झाले. आपली कॉंग्रेसची अगरबत्ती कुठे आहे? कॉंग्रेसची महाराष्ट्रातील अवस्था काय आहे? मुख्यमंत्री पदाची स्वप्ने कॉंग्रेसमध्ये कोण कोण बघत होते आणि त्यांच्या स्वप्नावर पाणी टाकण्याचे काम महाराष्ट्रातल्या जनतेने केले आहे. कॉंग्रेसमध्ये तुम्हाला कोणी विचारात नाही म्हणून प्रसिद्धीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवाभाऊ यांच्यावर टीका करू नका. मुंबईला आणि महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचे काम तुमचे सरकार असताना झाले होते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp