
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे आता प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी नाही. हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष केल्यानंतर नाना पटोले यांनी पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात अनेक पदाधिकाऱ्यांनी
.
कार्यकर्त्यांनी केवळ पद न घेता त्यांची जबाबदारी देखील योग्य पद्धतीने पार पाडावी. तसेच पक्ष आणि संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचे ध्येय धोरणे गाव पातळीवर प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे, असे आवाहन यावेळी पटोले यांनी केले. कार्यकर्त्यांनी पाच वर्षे मेहनत घ्यावी, पाच वर्षानंतर पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेत येईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नाना पटोले यांच्या उपस्थितीत भंडाऱ्यामध्ये पहिलाच पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाना पटोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
महिला कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक द्या
नाना पटोले यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांचा केवळ वापर न करण्याचा सल्ला दिला. महिला कार्यकर्त्यांना केवळ निवेदन देण्यासाठी किंवा मोर्चे काढण्यासाठी वापरू नका. तर त्यांना देखील बैठकांमध्ये सन्मानाची वागणूक द्या, असा सल्ला यावेळी पटोले यांनी दिला आहे. यासाठी लागणाऱ्या गाड्यांचा खर्चासाठी देखील कार्यकर्त्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट करावे. त्यांचा केवळ निवडणुकांमध्ये वापर न करता त्यांच्या भावना समजून घ्याव्यात, असे देखील नाना पटोले यांनी यावेळी म्हटले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.