
पहलगाम हल्ल्यात पुरुष पर्यटकांना टार्गेट करण्यात आले आहे. त्यांचा धर्म कोणता हे जाणून घेण्यासाठी त्यांना कलमा वाचायला लावला तर कपडे काढून ते मुसलमान नाहीत याची खात्री करण्यात आली मग गोळ्या घालण्यात आल्या, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यां
.
छगन भुजबळ म्हणाले की, काश्मीरचे जनजीवन जे सुरळीत सुरू होते. भारत अन् राज्य सरकारच्या माध्यमातून तिथे जो विकास सुरू आहे तो पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाहावले गेले नाही. काश्मीरमध्ये अराजकता निर्माण करण्यासाठी हा हल्ला झालेला आहे.
मुस्लीमांनी निषेध नोंदवावा
छगन भुजबळ म्हणाले की, पहलगाम हल्ल्या करण्याचा दुसरा उद्देश असा आहे की, काश्मीरमध्येच नाही तर संपूर्ण देशात तेढ निर्माण व्हावी हा देखील या हल्ल्याच्या मागे उद्देश असू शकतो. माझ्या सर्व मुस्लीम नेत्यांना आणि संघटनाना अशी विनंती आहे की त्यांनी कडक शब्दांमध्ये या घटनेचा निषेध केला पाहिजे. यासह त्यांनी म्हणावे आमच्या बांधवांचा या हल्ल्यात बळी गेला आहे. हे आम्ही सहन करु शकत नाही. त्यातून देशातील एकता ही जगासमोर येईल.
शांत राहणं गरजेचे
छगन भुजबळ म्हणाले की,या घटनेमुळे देशात कुठेच दंगल होऊ नये यांची आपणच काळजी घेतली पाहिजे. नाहीतर यामुळे इतराचे फावेल.देशात जर मारामाऱ्या सुरू झाल्या तर सरकार अन् जवान अस्वस्थ होतील. यामुळे आपण शांत राहणं गरजेचे आहे. पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात त्यांना यश येईल.
नेमके भुजबळ काय म्हणाले?
छगन भुजबळ म्हणाले की, केंद्र आणि तेथील स्थानिक राज्यसरकारकडून काश्मिरी नागरिकांच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण अशा सुधारणा करण्यात येत आहे. या होणाऱ्या सुधारणा पाकिस्थानी दहशतवाद्यांना पाहवत नसल्याने त्यांनी हा हल्ला केल्याचे दिसते आहे. या दहशत वाद्यांना काश्मीरचा विकास नको आहे. त्यांना याठिकाणी दहशत निर्माण करून संपूर्ण जगात याबाबत चुकीचा गैरसमज पसरविण्याचा तसेच देशातील हिंदू मुस्लीम नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. याबाबत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील तीव्र निषेध व्यक्त केला आहे.या घटनेबाबत देशातील मुस्लीम नेत्यांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून जे मारले गेले ते आमचे हिंदुस्थानी बंधू आहे हा हल्ला आम्ही कदापीही सहन करू शकत नाही हे म्हटले आहे. त्यातून देशाची एकता जगासमोर येईल आणि दहशतवाद्यांना देखील चपराक बसेल. भारत सरकार याकडे लक्ष देत असून यावर कारवाई करतीलच. या घटनेनंतर देशातील सर्व नागरिकांची जबाबदारी आहे की, देशातील सामाजिक सलोखा बिघडणार नाही. कुठेही दंगे तसेच अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. परकीय शक्तींना हाणून पडण्यासाठी आपल्याला एकसंघ राहावे लागेल. देशात शांतता राखून भारतीय सैन्याला तसेच सरकारला या विरोधात लढण्यासाठी बळ द्यावे.
हल्ल्यात मुस्लिमाचाही मृत्यू- आझमी
समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला धार्मिक रंग दिला जात आहे; त्यात मुस्लिमाचाही मृत्यू झाला. हे सरकारचे अपयश आहे, नैतिक आधारावर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.