
राज्यात महायुतीतील अंतर्गत नाराजीनाट्य चर्चेत असताना नाशिक कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीला जिल्ह्यातील दादा भुसे (शिंदेसेना), माणिकराव कोकाटे व नरहरी झिरवळ (दोघे राष्ट्रवादी) या तीन मंत्र्यांना न बोलाव
.
भाजपने मित्रपक्षांच्या नाराजीचा विचार न करता बैठकीत अनेक निर्णय घेतले. कुंभमेळ्याला दोन वर्षे बाकी असताना प्रशासकीय पातळीवर आराखड्याशिवाय काहीच झालेले नाही. मोठमोठी कामे करावी लागणार असून आत्तापासून निविदा प्रसिद्ध केली तर ठेकेदार नियुक्ती, कार्यारंभ आदेश व काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षे लागणार आहेत. मात्र, आराखडा निश्चित न होण्यामागे पालकमंत्री वाद कारणीभूत आहे.
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती केली होती. पण शिंदेसेनेचे दादा भुसे, राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे यांनी दावा केल्याने वाद उफाळून आला. त्यामुळे काही तासांतच फडणवीस यांना महाजनांच्या नियुक्तीस स्थगिती द्यावी लागली. दुसरीकडे फडणवीस यांनी जानेवारीपासून सलग तिसरी बैठक घेतल्यावर तिला स्थानिक पातळीवरील दादा भुसे (शिंदे सेना), माणिकराव कोकाटे व नरहरी झिरवळ (दोघे राष्ट्रवादी) तीन मंत्री असतानाही त्यांना बोलावले जात नसल्यामुळे आता शिवसेना व राष्ट्रवादीची नाराजी वाढल्याचे सांगितले जाते. त्यात २५ फेब्रुवारी रोजी बैठकीला निमंत्रितांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याव्यतिरिक्त जिल्ह्यातील एकाही मंत्री व आमदाराला स्थान न दिल्यामुळे नाराजीचा सूर वाढला आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दांडी मारल्याचे सांगितले जाते.
यापूर्वी शिंदेंनी घेतली समांतर बैठक
यापूर्वी नाशिकमध्ये आभार दौऱ्यानिमित्त आलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये समांतर बैठक घेत कुंभमेळा तसेच अन्य विषयांचा आढावा घेतला होता.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.